अ‍ॅपशहर

सीमेवर जाऊन पाक सैनिकांना मारा: आठवले

ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात 'खळ्ळ खटॅक' करणाऱ्या मनसेला केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे. फेरीवाल्यांना कशाला मारहाण करता? मारायचंच असेल तर सीमेवर जा आणि पाकिस्तानी सैनिकांना मारा, असं ते म्हणाले.

Maharashtra Times 22 Oct 2017, 12:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त | ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athawale slammed mns for its anti hawker agitation at thane kalyan
सीमेवर जाऊन पाक सैनिकांना मारा: आठवले


ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात 'खळ्ळ खटॅक' करणाऱ्या मनसेला केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे. फेरीवाल्यांना कशाला मारहाण करता? मारायचंच असेल तर सीमेवर जा आणि पाकिस्तानी सैनिकांना मारा, असं ते म्हणाले.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे रेल्वेविरोधात मोर्चा काढला होता. त्यात फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. रेल्वेनं कारवाई केली नाही तर पंधरा दिवसांनंतर आम्हीच फेरीवाल्यांना हाकलून लावू, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता. इशाऱ्यानंतर १५ दिवसांनी म्हणजेच काल, शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत त्यांना हुसकावून लावले होते. या 'खळ्ळ खटॅक'नंतर रामदास आठवले यांनी मिरा रोड येथील पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. मारहाण करायचीच असेल तर सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, असं आव्हान त्यांनी दिलं. मनसेची दादागिरी सुरूच राहिली तर भीमसैनिक 'ईट का जबाब पत्थर से देंगे' असा इशाराही त्यांनी दिला. फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी भीमसैनिक प्रसंगी रस्त्यावर उतरतील, असंही ते म्हणाले. बेकायदा फेरीवाल्यांवर पोलीस आणि स्थानिक प्रशासन कारवाई करतील, अशा शब्दांतही त्यांनी मनसेला सुनावलं.

गुजरातमध्ये भाजपला पाठिंबा, शिवसेनेला सल्ला

फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनावरून मनसेवर टीकास्त्र सोडणाऱ्या रामदास आठवले यांनी शिवसेनेलाही सल्ला दिला आहे. भाजपसोबत कुठलंही भांडण नको. दोन्ही पक्षांनी भविष्यातील निवडणुका एकत्र लढाव्यात, असं ते म्हणाले. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असेल. तसंच भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज