अ‍ॅपशहर

आठवलेंनी आर्थिक मदतीचं आश्वासन देताच कुटुंबीय संतापले, 'मदत नको, पण...'

डोंबिवलीजवळच्या संदप गावातील खदाणीत पाच जणांचा काही दिवसांपूर्वी बुडून मृत्यू होता. याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संबंधित कुटुंबीयांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. पण कुटुंबीय नाराज झाले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2022, 1:24 pm
डोंबिवली : डोंबिवली नजीक संदप गावातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर या गावातील पाणी समस्या प्रकर्षाने समोर आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी गावाला भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdas athawale visite sandap gaon dombivli
रामदास आठवलेंनी आर्थिक मदतीचं आश्वासन देताच कुटुंबीय संतापले, 'मदत नको, पण...'


रामदास आठवले यांनी यावेळी कुटुंबाला ५० हजारांची मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण या मदतीवरून कुटुंबातील सदस्य संतापले. आम्हाला पैसे नको, पाणी द्या. आमच्या घरातले सदस्य पाण्यावाचून गेलेत ते भरून देणार आहात का? आमदार येतात, खासदार येतात तुम्ही आलात. मदत कसली करता पाणी द्या, अशा संतप्त भावना त्यांनी आठवलेंकडे व्यक्त केल्या.

पीडित कुटुंबाच्या भावना लक्षात घेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांना धीर दिला. या गावातील पाणी समस्या तात्काळ सोडविण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि राजकारण करण्यासाठी नाही आलेलो नाही. जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासनाने देखील या खदानी बुजवण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच या गावाची पाणी समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

भिवंडीत केमिकल साठा असलेल्या इमारतीला अचानक लागली आग

कय घडलं होतं?

डोंबिवलीजवळच असलेल्या संदप गावात खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ७ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा, भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. यात अपेक्षा गायकवाड (वय ३०), मीरा गायकवाड (वय ५५), मयुरेश गायकवाड (वय १५), मोक्ष गायकवाड (वय १३) आणि निलेश गायकवाड (वय १५) यांचा यात मृत्यू झाला. हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते.

ठाण्यात मोठी दुर्घटना: केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटला; २ जण जखमी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज