अ‍ॅपशहर

Thane : करोना बिलांच्या परताव्याचा विसर; रुग्णांचे ५४ लाख ९९ हजार रुपये देणे शिल्लक

आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले. या पथकांनी लेखा परीक्षण करून १ कोटी ८९ लाख ८२ हजार १२८ रुपयांची बिलांची रक्कम अतिरिक्त असल्याचे स्पष्ट केले होते.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 13 Jan 2023, 1:56 pm
ठाणे : करोना उपचाराचे अवाजवी बिले देत रुग्णांचे खिसे कापणाऱ्या खासगी रुग्णालयांना लगाम घालण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने करोना रुग्णांचे बिल योग्य पद्धतीने तपासण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. यामध्ये १ कोटी ८९ लाख ८२ हजार रुपयांच्या आक्षेपार्ह बिलांची प्रकरणे उघड झाली. गेल्या दोन वर्षांपासून या अतिरिक्त बिलांचा परतावा करण्याची प्रक्रिया सुरू असून आत्तापर्यंत १ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपयांचा रुग्णांना परतावा केला असून अद्यापही ५४ लाख ९९ हजार रुपयांचा परतावा शिल्लक आहे. शहरातील तीन रुग्णालयांकडे १० लाखांपेक्षा जास्त परतावा शिल्लक असल्याने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे पत्र लेखा परीक्षण विभागाने आरोग्य विभागाला दिले आहे. परंतु त्यानंतरही या रुग्णालयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे मनसेचे संदीप पाचंगे यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona
करोना बिलांच्या परताव्याचा विसर; रुग्णांचे ५४ लाख ९९ हजार रुपये देणे शिल्लक


प्रशासनाने करोना रुग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी ८ कनिष्ठ लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले. या पथकांनी लेखा परीक्षण करून १ कोटी ८९ लाख ८२ हजार १२८ रुपयांची बिलांची रक्कम अतिरिक्त असल्याचे स्पष्ट केले होते. या रकमेचा परतावा मिळावा यासाठी पाचंगे यांनी पत्रव्यवहार करून याविरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली होती. अखेर या प्रकरणी रुग्णांची अतिरिक्त रक्कम परत करण्याची रुग्णालयांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आजही अनेक रुग्णालयांकडे १० लाखांहून अधिक परताव्याची रक्कम पडून आहे. या रुग्णालयांवर कारवाई करण्याची भूमिका ठाणे महापालिकेच्या लेखा परिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्र आरोग्य विभागाकडे पाठवूनही आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही. टाळाटाळ करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख