मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
जातीपाती मानत राहिलो तर महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असा सावधानतेचा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीवर आधारित आरक्षण रद्द करा आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. ठाण्यात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चांच्या शिस्तीचे कौतुक करत राज यांनी उदाहरण देत अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावरही बोट ठेवले. तसंच जातीपातीच्या राजकारणात न पडण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांना केलं. 'गेली १० ते १५ वर्ष केंद्रात आणि सत्तेत काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळीच त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठ्यांचा राजकीय वापर होतोय. आरक्षणाच्या माध्यमातून समाजात दरी निर्माण करण्याचं काम होतंय. सर्वच पक्षांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचं आहे', असा आरोप राज यांनी केला. 'निवडणुकांचा विचार करून मी कधीच भूमिका मांडत नसतो. तर महाराष्ट्राचा विचार करून भूमिका मांडतो. म्हणून नेत्यांनो, जाती जातीत विष कालवून महाराष्ट्राचं वाटोळ करू नका', असं आवाहन राज यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना केलं आहे.
'पंतप्रधानांना भेटण्याची वेळ आली तर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी करेन', असं राज यांनी सांगितलं. 'आरक्षण मागताय पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरात उद्योग उभे राहत आहेत. त्यात ग्रामीण मुलांना रोजकार का मिळत नाही? असा सवाल करत राज यांनी महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये १०० टक्के मराठी तरूणांची भरती सक्तीची करा', अशी मागणी केली.
जातीपाती मानत राहिलो तर महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असा सावधानतेचा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीवर आधारित आरक्षण रद्द करा आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. ठाण्यात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चांच्या शिस्तीचे कौतुक करत राज यांनी उदाहरण देत अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावरही बोट ठेवले. तसंच जातीपातीच्या राजकारणात न पडण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांना केलं. 'गेली १० ते १५ वर्ष केंद्रात आणि सत्तेत काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळीच त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठ्यांचा राजकीय वापर होतोय. आरक्षणाच्या माध्यमातून समाजात दरी निर्माण करण्याचं काम होतंय. सर्वच पक्षांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचं आहे', असा आरोप राज यांनी केला. 'निवडणुकांचा विचार करून मी कधीच भूमिका मांडत नसतो. तर महाराष्ट्राचा विचार करून भूमिका मांडतो. म्हणून नेत्यांनो, जाती जातीत विष कालवून महाराष्ट्राचं वाटोळ करू नका', असं आवाहन राज यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना केलं आहे.
'पंतप्रधानांना भेटण्याची वेळ आली तर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी करेन', असं राज यांनी सांगितलं. 'आरक्षण मागताय पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरात उद्योग उभे राहत आहेत. त्यात ग्रामीण मुलांना रोजकार का मिळत नाही? असा सवाल करत राज यांनी महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये १०० टक्के मराठी तरूणांची भरती सक्तीची करा', अशी मागणी केली.