कल्याण : कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा लक्ष्मण भोईर चाळीत राहणारे संजय गुप्ता (२२) हे रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाहून मोहने येथे जात असताना भरधाव येणाऱ्या कारने रिक्षाला धडक दिली. यानंतर कारचालक सुसाट वेगाने पळून गेला. या अपघातात रिक्षा उलटल्याने रिक्षाचालक संजय गुप्ता यांना दुखापत झाली असून त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
भरधाव कारची रिक्षाला धडक
कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा लक्ष्मण भोईर चाळीत राहणारे संजय गुप्ता (२२) हे रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ...
Maharashtra Times 9 Sep 2018, 4:00 am