पालघर: गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार-मोखाडा परिसरात नद्यांना पूल्याने घराघरात पाणी शिरले आहे. जव्हार-मोखाड्यातील रस्तेही पाण्याखाली गेले असून मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
आठवडाभरापासून पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जव्हार-मोखाड्यात पूर आला असून येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे जव्हारहून मोखाडा व पुढे नाशिककडे जाणाऱ्या मोरचुंडी पुलाच्या बाजूचा रस्ता पूर्णपणे खडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आल्याने नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मोखाड्यातील ग्रामस्थांचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. तर त्र्यंबकेश्वर येथेही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान, इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वेरुळावर डोंगरावरची माती पडल्याने मध्य रेल्वेची इगतपुरी-कसारा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ही वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याचं रेल्वेने स्पष्ट केलंय.
आठवडाभरापासून पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जव्हार-मोखाड्यात पूर आला असून येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे जव्हारहून मोखाडा व पुढे नाशिककडे जाणाऱ्या मोरचुंडी पुलाच्या बाजूचा रस्ता पूर्णपणे खडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आल्याने नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मोखाड्यातील ग्रामस्थांचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. तर त्र्यंबकेश्वर येथेही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान, इगतपुरीकडे जाणाऱ्या रेल्वेरुळावर डोंगरावरची माती पडल्याने मध्य रेल्वेची इगतपुरी-कसारा वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर ही वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याचं रेल्वेने स्पष्ट केलंय.