अ‍ॅपशहर

राम मंदिरासाठी संघर्ष करू: मोहन भागवत

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी संघर्ष करावा लागला तरी तो करू, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी डहाणू तालुक्यातील आसवे येथे रविवारी केले.

Maharashtra Times 16 Apr 2018, 1:50 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mohan-bhagawat


अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी संघर्ष करावा लागला तरी तो करू, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी डहाणू तालुक्यातील आसवे येथे रविवारी केले.

तलासरी येथील जनजाती प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यात भागवत बोलत होते. आदिवासी समाजाला हिंदू धर्मापासून तोडू पाहणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना आळा घालण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे सांगत, अशा शक्तींपासून सावध व्हावे, असे त्यांनी सुचविले. हिंदू संस्कृतीचे सर्व अनुयायी हे आपले बांधव आहेत. सुमारे दोन हजार वर्षे कधीही, कुणापुढेही शरणागती पत्करली नाही तो समाज म्हणजे आदिवासी समाज होय, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज