म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक व फळ बागायदारांचा कृषी माल त्यांच्या तालुक्यातच विक्री करण्यासाठी वाहनाचा परवाना आरटीओ कार्यलयाकडून देण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार, वसई, मोखाडा या आठही तालुक्यांतील बागायदारांना भाजीपाला आणि फळांची विक्री करण्यास करोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणी निर्माण झाल्या होत्या.
जिल्ह्यातील शेतकऱ्याने आरटीओ कार्यलयाकडे वाहतूक परवाना अर्ज ऑनलाइनद्वारे केल्यास त्यांना हा परवाना देण्यात येत आहे. त्यासाठी mh48drtovasai@gmail. com या ईमेल आयडीवर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५६६०५७ अथवा ८०८७६५१०२० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचीही सूचना करण्यात आली आहे.