ध्वनिचित्रफीतून उलगडणार ‘सावरकर शिखर मोहीम’
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
साहित्य, स्वातंत्र्यसंग्रामाच्या कथा आणि विचारांतूनच तरुणांना नवी दिशा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव हिमाचल प्रदेशातील उंच शिखरावर पोहचविण्याचा विक्रम करणाऱ्या तरुणांचा चित्तथरारक प्रवास ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. ठाण्यात रंगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गिर्यारोहकांच्या या कार्याचा अनुभव देणारी चित्रफीत शहरातील अनेक ठिकाणी दाखविली जाणार आहे.
इतिहासाच्या पुस्तकापासून ते ‘काळे पाणी’ या आत्मचरित्रापर्यंत अनेक साहित्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तरुण पिढीला ओळख झाली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान, शिक्षा भोगतानाही कायम राहिलेले देशावरचे प्रेम आणि कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती असे त्यांचे अनेक गुण तरुणपिढीला भुरळ घालतात, मात्र त्यांच्या याच गुणांमुळे त्यांचे नाव एखाद्या उंच आणि अवघड शिखराला हवे आणि सावरकरांच्या नावाने संपूर्ण जगाने शिखराकडे अभिमानाने पहावे, असा वेगळा विचार देशातील सात गर्यारोहकांनी केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांच्या प्रवासाची सुरुवात झाली.
सावरकरांच्या आत्मार्पणाला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना हिमालयातील बेलाग शिखराची निवड या गिर्यारोहकांतर्फे करण्यात आली. तोपर्यंत या शिखरावर चीनमधील काही गिर्यारोहकांनी चढी केली होती, मात्र त्या सर्व मोहिमा अयशस्वी ठरल्या होत्या, अशी अवघड मोहीम १८ दिवसांत सर केल्याचा विक्रम सात भारतीय गिर्यारोहकांनी केला. त्यामध्ये मुंबई, तामिळनाडू, बंगाल येथील गिर्यारोहकांचा समावेश होता. मात्र मोहिमेवर जाण्यापूर्वीच शिखराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचे निश्चित झाल्याने या मोहिमेला ‘सावरकर शिखर मोहीम’ असे संबोधण्यात आले होते. अपार मेहनतीच्या बळावर या शिखरावर तिरंगा फडकाविल्यानंतर दिल्ली येथील सरकारच्या माऊंटेनिअरिंग सोसायटी या विभागाकडे नावासंबंधी निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गिर्यारोहकांनी हा सर्व प्रवास फोटो, दृश्य यांच्या माध्यमातून संकलित केला आहे. हा प्रवास ठाणेकरांना अनुभवता यावा, यासाठी सावरकर साहित्य संमेलनाच्या आयोजकांतर्फे संमेलनात ही चित्रफीत दाखविली जाणार आहे. संमेलनाच्या पूर्वरंगात शहरात अनेक ठिकाणी विविध व्याख्याने, कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २० एप्रिल रोजी सहयोग मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ही ध्वनिचित्रफीत दाखविली जाणार आहे.
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
साहित्य, स्वातंत्र्यसंग्रामाच्या कथा आणि विचारांतूनच तरुणांना नवी दिशा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव हिमाचल प्रदेशातील उंच शिखरावर पोहचविण्याचा विक्रम करणाऱ्या तरुणांचा चित्तथरारक प्रवास ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. ठाण्यात रंगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गिर्यारोहकांच्या या कार्याचा अनुभव देणारी चित्रफीत शहरातील अनेक ठिकाणी दाखविली जाणार आहे.
इतिहासाच्या पुस्तकापासून ते ‘काळे पाणी’ या आत्मचरित्रापर्यंत अनेक साहित्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तरुण पिढीला ओळख झाली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान, शिक्षा भोगतानाही कायम राहिलेले देशावरचे प्रेम आणि कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची वृत्ती असे त्यांचे अनेक गुण तरुणपिढीला भुरळ घालतात, मात्र त्यांच्या याच गुणांमुळे त्यांचे नाव एखाद्या उंच आणि अवघड शिखराला हवे आणि सावरकरांच्या नावाने संपूर्ण जगाने शिखराकडे अभिमानाने पहावे, असा वेगळा विचार देशातील सात गर्यारोहकांनी केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांच्या प्रवासाची सुरुवात झाली.
सावरकरांच्या आत्मार्पणाला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना हिमालयातील बेलाग शिखराची निवड या गिर्यारोहकांतर्फे करण्यात आली. तोपर्यंत या शिखरावर चीनमधील काही गिर्यारोहकांनी चढी केली होती, मात्र त्या सर्व मोहिमा अयशस्वी ठरल्या होत्या, अशी अवघड मोहीम १८ दिवसांत सर केल्याचा विक्रम सात भारतीय गिर्यारोहकांनी केला. त्यामध्ये मुंबई, तामिळनाडू, बंगाल येथील गिर्यारोहकांचा समावेश होता. मात्र मोहिमेवर जाण्यापूर्वीच शिखराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचे निश्चित झाल्याने या मोहिमेला ‘सावरकर शिखर मोहीम’ असे संबोधण्यात आले होते. अपार मेहनतीच्या बळावर या शिखरावर तिरंगा फडकाविल्यानंतर दिल्ली येथील सरकारच्या माऊंटेनिअरिंग सोसायटी या विभागाकडे नावासंबंधी निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गिर्यारोहकांनी हा सर्व प्रवास फोटो, दृश्य यांच्या माध्यमातून संकलित केला आहे. हा प्रवास ठाणेकरांना अनुभवता यावा, यासाठी सावरकर साहित्य संमेलनाच्या आयोजकांतर्फे संमेलनात ही चित्रफीत दाखविली जाणार आहे. संमेलनाच्या पूर्वरंगात शहरात अनेक ठिकाणी विविध व्याख्याने, कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २० एप्रिल रोजी सहयोग मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ही ध्वनिचित्रफीत दाखविली जाणार आहे.