रेल्वे पोलिस आणि सुरक्षा दलाची संयुक्त तपासणी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाणे शहरांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा यंत्रणांनीही संपूर्ण परिसराचा धावता आढावा घेतला. पोलिस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचून त्यांच्या बॉम्ब शोधक पथक आणि श्वानपथकाने परिसराचा आढावा घेतला. मोठ्या संख्येने उपस्थित सुरक्षा यंत्रणांच्या वावरामुळे प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसत होता. रेल्वे फलाट, पादचारी पूल, स्कायवॉक आणि पार्किंगचा परिसर या पथकाने पालथा घातल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
पुलवामा हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणांकडून अधिक दक्षता बाळगली जात असताना रायगडच्या आपटा येथील एसटीतील बॉम्ब आणि दहिसरमधील स्फोट यामुळे रेल्वे स्थानकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांच्या तयारीच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून संयुक्त तपास मोहीम राबविण्यात आली. यावेळी श्वानपथके आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण स्थानकाचा परिसर पिंजून काढला. यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याची जागृतीही करण्यात आली. स्थानक परिसरातील फलाटांवरील सामान, बॅगा, बेवारस वस्तूंचाही तपास करण्यात आला. वाहनतळ, दुचाकी पार्किंग आणि पादचारी पुलांवरही पथकाकडून निरीक्षण करण्यात आले. पोलिसांच्या या पथकांकडून ठिकठिकाणी पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचा आढावाही या निमित्ताने घेण्यात आला. पोलिसांच्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारीही सहभागी होते, अशी माहिती प्रवास संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
तपासणीचा देखावा नको…
२६ नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक रेल्वे स्थानकात कोट्यवधी रुपयांचे सुरक्षा साहित्य दाखल झाले असले तरी अवघ्या काही वर्षांमध्ये त्यांची दुरवस्था झाली आहे. नुकत्याच काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांच्या मॉक ड्रील आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. परंतु या सगळ्याची केवळ हल्ल्याच्या काळापुरतीच नव्हे तर कायम स्वरूपी यंत्रणांनी पाहणी करणे गरजेचे आहे. केवळ आदेश आल्यामुळे देखावा नको तर प्रत्यक्ष तपासणीही होण्याची गरज, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाणे शहरांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा यंत्रणांनीही संपूर्ण परिसराचा धावता आढावा घेतला. पोलिस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचून त्यांच्या बॉम्ब शोधक पथक आणि श्वानपथकाने परिसराचा आढावा घेतला. मोठ्या संख्येने उपस्थित सुरक्षा यंत्रणांच्या वावरामुळे प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसत होता. रेल्वे फलाट, पादचारी पूल, स्कायवॉक आणि पार्किंगचा परिसर या पथकाने पालथा घातल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
पुलवामा हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणांकडून अधिक दक्षता बाळगली जात असताना रायगडच्या आपटा येथील एसटीतील बॉम्ब आणि दहिसरमधील स्फोट यामुळे रेल्वे स्थानकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांच्या तयारीच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून संयुक्त तपास मोहीम राबविण्यात आली. यावेळी श्वानपथके आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण स्थानकाचा परिसर पिंजून काढला. यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याची जागृतीही करण्यात आली. स्थानक परिसरातील फलाटांवरील सामान, बॅगा, बेवारस वस्तूंचाही तपास करण्यात आला. वाहनतळ, दुचाकी पार्किंग आणि पादचारी पुलांवरही पथकाकडून निरीक्षण करण्यात आले. पोलिसांच्या या पथकांकडून ठिकठिकाणी पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचा आढावाही या निमित्ताने घेण्यात आला. पोलिसांच्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारीही सहभागी होते, अशी माहिती प्रवास संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
तपासणीचा देखावा नको…
२६ नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक रेल्वे स्थानकात कोट्यवधी रुपयांचे सुरक्षा साहित्य दाखल झाले असले तरी अवघ्या काही वर्षांमध्ये त्यांची दुरवस्था झाली आहे. नुकत्याच काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांच्या मॉक ड्रील आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. परंतु या सगळ्याची केवळ हल्ल्याच्या काळापुरतीच नव्हे तर कायम स्वरूपी यंत्रणांनी पाहणी करणे गरजेचे आहे. केवळ आदेश आल्यामुळे देखावा नको तर प्रत्यक्ष तपासणीही होण्याची गरज, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.