नुकसान भरपाईची स्वयंसेवी संस्थांची मागणी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधेचे दुष्परिणाम सातत्याने दिसून येत असतानाच कळव्यातील एका गटाराची साफसफाई करत असताना त्यातील विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून झहीर अन्सारी या सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत कामगाराच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देत कंत्राटदारांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी कामगार संघटना तसेच स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
सुरक्षेचे अद्ययावत साहित्य, पावसाळ्यात अथवा रात्रीच्या वेळी काम करताना वापरण्यात येणारी साधने अशा अनेक बाबींची आवश्यकता असूनही प्रशासनाकडून त्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून केली जाते. गटारे, नाले यांची सफाई करताना त्यामध्ये उघड्या वायरी किंवा विजेच्या तारांचा धक्का लागल्याच्या घटनाही घडतात. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. शनिवारी सायंकाळी सफाई कामगार झहीर कळव्यातील मातोश्री जानकी नगर रहिवासी संघ येथे गटारे स्वच्छ करण्याचे काम करत होते. कोणत्याही सुविधांविना काम करणाऱ्या झहिर यांना गटारात उघड्या असलेल्या तारांचा धक्का लागला. हा विजेचा धक्का अत्यंत तीव्र होता. सहकाऱ्यांनी त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने भरती केले, मात्र विजेचा धक्का अत्यंत तीव्र असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. सुविधांचा अभाव आणि उघड्या तारांमुळे हा मृत्यू ओढविल्याचा आरोप अन्य कामगारांनी केला आहे. याबाबत त्यांनी ‘जीवनधारा संघ’ या स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली. शनिवारी मध्यरात्री सर्व कामगार छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जमले होते. मृत कामगाराच्या पश्चात त्यांची पत्नी आणि चार लहान मुले असा परिवार असल्याने त्यांच्या पत्नीला नुकसान भरपाई मिळावी आणि मृत्यूस जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही यावेळी जोर धरत होती. रविवारी दुपारनंतर शवविच्छेदन करण्यात आले, मात्र अन्य कामगार नुकसान भरपाईच्या मागणीवर ठाम होते.
सुविधांचा अभाव आणि काम करताना उघड्या तारांचे संकट यांमुळे अनेक कामगारांचा यापूर्वीही मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून ती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.
- प्रिया कुलकर्णी, जीवनधारा संघ
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधेचे दुष्परिणाम सातत्याने दिसून येत असतानाच कळव्यातील एका गटाराची साफसफाई करत असताना त्यातील विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून झहीर अन्सारी या सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत कामगाराच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देत कंत्राटदारांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी कामगार संघटना तसेच स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
सुरक्षेचे अद्ययावत साहित्य, पावसाळ्यात अथवा रात्रीच्या वेळी काम करताना वापरण्यात येणारी साधने अशा अनेक बाबींची आवश्यकता असूनही प्रशासनाकडून त्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून केली जाते. गटारे, नाले यांची सफाई करताना त्यामध्ये उघड्या वायरी किंवा विजेच्या तारांचा धक्का लागल्याच्या घटनाही घडतात. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही. शनिवारी सायंकाळी सफाई कामगार झहीर कळव्यातील मातोश्री जानकी नगर रहिवासी संघ येथे गटारे स्वच्छ करण्याचे काम करत होते. कोणत्याही सुविधांविना काम करणाऱ्या झहिर यांना गटारात उघड्या असलेल्या तारांचा धक्का लागला. हा विजेचा धक्का अत्यंत तीव्र होता. सहकाऱ्यांनी त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने भरती केले, मात्र विजेचा धक्का अत्यंत तीव्र असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. सुविधांचा अभाव आणि उघड्या तारांमुळे हा मृत्यू ओढविल्याचा आरोप अन्य कामगारांनी केला आहे. याबाबत त्यांनी ‘जीवनधारा संघ’ या स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली. शनिवारी मध्यरात्री सर्व कामगार छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जमले होते. मृत कामगाराच्या पश्चात त्यांची पत्नी आणि चार लहान मुले असा परिवार असल्याने त्यांच्या पत्नीला नुकसान भरपाई मिळावी आणि मृत्यूस जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही यावेळी जोर धरत होती. रविवारी दुपारनंतर शवविच्छेदन करण्यात आले, मात्र अन्य कामगार नुकसान भरपाईच्या मागणीवर ठाम होते.
सुविधांचा अभाव आणि काम करताना उघड्या तारांचे संकट यांमुळे अनेक कामगारांचा यापूर्वीही मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून ती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.
- प्रिया कुलकर्णी, जीवनधारा संघ