अ‍ॅपशहर

शिवसेनेचाही ईव्हीएम लढा

ईव्हीएम मशिनचा ‘कारभार’ संशयास्पद असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असतानाच ठाण्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि ईव्हीएम मशिनमध्ये हेराफेरी करून भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केला आहे. त्याविरोधात निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

Maharashtra Times 1 Mar 2017, 4:00 am
निवडणूक आयोग, पालिका आयुक्तांकडे तक्रार; न्यायालयाही जाणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsenas allegetion of evm scam
शिवसेनेचाही ईव्हीएम लढा


म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

ईव्हीएम मशिनचा ‘कारभार’ संशयास्पद असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असतानाच ठाण्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि ईव्हीएम मशिनमध्ये हेराफेरी करून भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केला आहे. त्याविरोधात निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे तरे यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक १० आणि ११ मध्ये पराभूत झालेले उमेदवार अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले असून मंगळवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेत वादग्रस्त कारभार चव्हाट्यावर आणला. या दोन्ही प्रभागातील निकालाला स्थगिती मिळावी आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मतदान झाल्यानंतर आणि मतमोजणीपूर्वी या प्रभागातील ईव्हीएम मशीन होलीक्रॉस शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता दोन संशयास्पद वाहनांनी स्ट्राँग रूमच्या आवारामध्ये प्रवेश केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांना त्याबाबतची कल्पना फोनवर दिल्यानंतरही त्या चार तासांनी घटनास्थळी आल्या. तिथे जमलेल्या जमवाला पांगविण्यासाठी पोलिसांना तिथे लाठीचार्जही करावा लागला होता. त्याचवेळी ईव्हीएम मशिनमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचा तरे यांचा आरोप आहे. मतमोजणीपूर्वी झालेल्या सर्व प्रकारचे चित्रिकरण दाखवण्यात यावे, त्यानंतरच मतमोजणीला सुरुवात करावी अशी मागणी करूनही निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी तसे न करता मतमोजणी केली. विशेष म्हणजे स्ट्रॉग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नसल्याचे या उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. ईव्हीएम मशिन उलट्या क्रमाने लावण्यात आल्या होत्या. प्रारूप प्रभाग रचना झाल्यानंतर भाजपचे उमेदवार मिलिंद पाटणकर यांनी नोंदविलेल्या हरकतीनंतर ६० इमारती प्रभाग क्रमांक १० मधून वगळता ११ मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. भाजपच्या उमेदवरांना जिंकण्यासाठी हे गैरप्रकार केल्याचा आरोप तरे यांनी केला आहे.

कार्यपद्धतीवर आक्षेप

मनसेचे प्रभाग क्रमांक २२ येथील पदाधिकारी प्रदीप सावर्डेकर यांनी देखील ईव्हीएम मशिनच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. कोपरीत देखील मनसेच्या पराभूत उमेदवार समीषा मार्कंडे यांनी कोपरी गावातील शाळा क्र मांक १६ मध्ये रूम ५९ मधील एका मशीनमध्ये बिघाड झाला होता. हे मशीन २ तास बंद होती. तर याच दिवशी मतदानाच्या सुरवातीला मशीन या सरळ न लावता उलट्या क्रमाने लावल्या होत्या. हा प्रकार संशयास्पद असून त्याच्या चौकशीची मागणी मार्कंडे यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज