म. टा. वृत्तसेवा, कल्याण
महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या ठरावास महासभेने मंजुरी देऊनही प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने कंत्राटी कार्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत वारंवार मागणी करून निर्णय घेतला जात नसल्यामुळे प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेचे कर्मचारी बुधवारपासून पालिका मुख्यालयासमोर उपोषण छेडणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या परिवहन उपक्रमात ५५० चालक-वाहक आहेत. ७२ कंत्राटी कामगार मागील १२ वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. सलग १२ वर्षे काम केलेल्या या परिवहनच्या पटलावर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. हा ठराव होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रशासनाकडून या ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनेकडून याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र परिवहन उपक्रम, सामान्य प्रशासन, तसेच पालिका आयुक्तांकडून यावर कार्यवाही होताना दिसत नाही.
अनेक कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. आजही या कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन मिळत आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेच्या वतीने याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेने केला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, प्रशासनाने या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी आता या कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बुधवारपासून हे कर्मचारी पालिका मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या ठरावास महासभेने मंजुरी देऊनही प्रशासनाकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने कंत्राटी कार्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत वारंवार मागणी करून निर्णय घेतला जात नसल्यामुळे प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेचे कर्मचारी बुधवारपासून पालिका मुख्यालयासमोर उपोषण छेडणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या परिवहन उपक्रमात ५५० चालक-वाहक आहेत. ७२ कंत्राटी कामगार मागील १२ वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. सलग १२ वर्षे काम केलेल्या या परिवहनच्या पटलावर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. हा ठराव होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रशासनाकडून या ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनेकडून याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र परिवहन उपक्रम, सामान्य प्रशासन, तसेच पालिका आयुक्तांकडून यावर कार्यवाही होताना दिसत नाही.
अनेक कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. आजही या कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन मिळत आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेच्या वतीने याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेने केला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, प्रशासनाने या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी आता या कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. बुधवारपासून हे कर्मचारी पालिका मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.