अ‍ॅपशहर

जि. प. शाळांमध्ये सडक्या धान्याचे मध्यान्ह भोजन

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या मध्यान्य भोजन आहाराचा तिढा सुटेना झाला आहे. जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अळ्या पडलेला आणि किडलेला धान्य पुरवठा केला जात असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव सडक्या धान्याचे मध्यान्ह भोजन खाण्याची वेळ आली आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.

Maharashtra Times 14 Mar 2018, 10:00 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students being given poor quality mid day meals at zp schools
जि. प. शाळांमध्ये सडक्या धान्याचे मध्यान्ह भोजन


जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या मध्यान्य भोजन आहाराचा तिढा सुटेना झाला आहे. जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अळ्या पडलेला आणि किडलेला धान्य पुरवठा केला जात असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव सडक्या धान्याचे मध्यान्ह भोजन खाण्याची वेळ आली आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.

जव्हार तालुक्यात २५५ जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वीपर्यंत एकूण १६ हजार ३४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना कुजके आणि अळ्या पडलेले मध्यान्ह भोजन दिले जात आहे. मागील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पंचायत समिती सदस्य सुधाकर वळे आणि मनू गावंढा यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दिला जाणारा मध्यान्ह आहाराचा प्रश्न पंचायत समितीच्या आढावा बैठकीच्यावेळी शिक्षण विभागासमोर उपस्थित केला होता. मात्र हा प्रश्न अद्याप कायम आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी तांदूळ, मूगडाळ, वाटाणा डाळ, तूरडाळ, मोहरी, हळद, तेल असा धान्याचा पुरवठा करण्याचा ठेका महाराष्ट्र राज्य कॉ. मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांना देण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराकडून कुजक्या आणि सडक्या तसेच अर्धवट धान्याचा पुरवठा सर्रास केला जात आहे. तसेच अपु-या डाळी पुरवठ्यामुळे शाळेतील मुलांना कोरडा भात देखील खावा लागत असल्याचे पालकांकडून बोलले जात आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगण्यात येते कि, दर महिन्याला महाराष्ट्र राज्य कॉ. मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्याकडून केला जाणाऱ्या पुरवठ्यामध्ये काही चांगल्या धान्याची पोती सोडली तर बऱ्याच पोत्यांत अळ्या पडलेला सडका आणि कुजका तांदुळ असतो. मात्र काही अडचणींमुळे आम्ही ह्या गोष्टी सांगू शकत नाही. आम्हाला नाईलाजास्तव खराब धान्यही उतरुन घ्यावे लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळेत खिचडी, डाळ, भात शिजवून देणाऱ्या बचत गटांतील महिलांकडून सांगण्यात येते की, अळ्या पडलेले धान्यही आम्हाला निवडून खिचडी, डाळ, भात करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा त्या ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात देखील आणून देतात. कुजक्या धान्यापासून बनवलेले अन्न खाऊन मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता पालकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी पालक करीत आहेत.

ज्या जिल्हा परिषद शाळांना सडका-कुजका तसेच अळ्या पडलेला जुना तांदूळ, डाळ मिळत असेल तर त्या शिक्षकांनी ते धान्य उतरून घेऊ नये, अशा सूचना शिक्षकांना केल्या आहेत. शिवाय या शाळांनी अळ्या पडलेले आणि खराब धान्य मिळत असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्यावे.

- भरत कासले, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, जव्हार


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज