कल्याणमधील नूतन ज्ञानमंदिराचा उपक्रम
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
पुण्यापासून सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम आता थेट शाळेपर्यंत पोहोचला आहे. शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने कल्याण पश्चिमेकडील नूतन विद्यालयाने हा उप्रकम सुरू केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दर गुरुवारी सकाळी शाळा भरल्यानंतर शाळेकडून या भिंतीजवळ ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
गरजूंना आवश्यक त्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि ज्यांच्याकडे या वस्तू अनेक दिवसांपासून पडून आहेत त्या वस्तूंचे दान करून सत्कर्म करता यावे, या उद्देशाने पुण्यात सुरू झालेली माणुसकीची भिंत या उपक्रमाचे अनेक स्तरांतून कौतुक झाल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, डोंबिवलीसह महत्त्वाच्या शहरात या उपक्रमाची पुनरावृत्ती करण्यात आली. आपल्याकडील स्वेटर, कपडे, भांडी, मुलांचे कपडे यांसारख्या वापरातील मात्र अनेक दिवसांपासून पडून असलेल्या सुस्थितीतील वस्तू या भिंतीसमोर ठेवल्या जातात. ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे, तो ती वस्तू घेऊन जातो. हा उपक्रम शाळेनेदेखील हाती घेतला आहे. कल्याण पश्चिमेकडील नूतन विद्यालयात शिक्षकांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या भव्य पटांगणावर प्रवेशद्वारा नजीकच्या भिंतीला माणुसकीची भिंत म्हणून नामकरण करण्यात आले. ही भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यात आली आहे.
या भिंतीला टेकून फोल्डिंगचे टेबल बनविण्यात आले असून आठवड्यातील गुरुवारी हा उपक्रम राबविला जातो. यादिवशी शाळेत येणारी मुले तसेच मुलांना सोडण्यासाठी येणारे पालक आपल्या पाल्याकडे असलेले अधिकचे साहित्य कम्पासबॉक्स, स्केचपेन, स्कूल बॅग, वॉटर बॅग, पेन, पेन्सिल, युनिफॉर्म, बूट, मौजे यांसारखे साहित्य या टेबलावर आणून ठेवत असून ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची शिक्षकांकडे मागणी करतात. शिक्षक त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असून एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकच साहित्य हवे असल्यास पुढील आठवड्यात तसे साहित्य आल्यास देण्याचे आश्वासन दिले जाते. शाळेतील शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करून या टेबलावर ठेवतात, असे शाळेच्या उपमुख्याध्यापिका अपर्णा चौधरी यांनी सांगितले.
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
पुण्यापासून सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम आता थेट शाळेपर्यंत पोहोचला आहे. शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने कल्याण पश्चिमेकडील नूतन विद्यालयाने हा उप्रकम सुरू केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दर गुरुवारी सकाळी शाळा भरल्यानंतर शाळेकडून या भिंतीजवळ ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
गरजूंना आवश्यक त्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि ज्यांच्याकडे या वस्तू अनेक दिवसांपासून पडून आहेत त्या वस्तूंचे दान करून सत्कर्म करता यावे, या उद्देशाने पुण्यात सुरू झालेली माणुसकीची भिंत या उपक्रमाचे अनेक स्तरांतून कौतुक झाल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, डोंबिवलीसह महत्त्वाच्या शहरात या उपक्रमाची पुनरावृत्ती करण्यात आली. आपल्याकडील स्वेटर, कपडे, भांडी, मुलांचे कपडे यांसारख्या वापरातील मात्र अनेक दिवसांपासून पडून असलेल्या सुस्थितीतील वस्तू या भिंतीसमोर ठेवल्या जातात. ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे, तो ती वस्तू घेऊन जातो. हा उपक्रम शाळेनेदेखील हाती घेतला आहे. कल्याण पश्चिमेकडील नूतन विद्यालयात शिक्षकांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या भव्य पटांगणावर प्रवेशद्वारा नजीकच्या भिंतीला माणुसकीची भिंत म्हणून नामकरण करण्यात आले. ही भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यात आली आहे.
या भिंतीला टेकून फोल्डिंगचे टेबल बनविण्यात आले असून आठवड्यातील गुरुवारी हा उपक्रम राबविला जातो. यादिवशी शाळेत येणारी मुले तसेच मुलांना सोडण्यासाठी येणारे पालक आपल्या पाल्याकडे असलेले अधिकचे साहित्य कम्पासबॉक्स, स्केचपेन, स्कूल बॅग, वॉटर बॅग, पेन, पेन्सिल, युनिफॉर्म, बूट, मौजे यांसारखे साहित्य या टेबलावर आणून ठेवत असून ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची शिक्षकांकडे मागणी करतात. शिक्षक त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असून एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकच साहित्य हवे असल्यास पुढील आठवड्यात तसे साहित्य आल्यास देण्याचे आश्वासन दिले जाते. शाळेतील शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करून या टेबलावर ठेवतात, असे शाळेच्या उपमुख्याध्यापिका अपर्णा चौधरी यांनी सांगितले.