अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांनी पाठवली पोस्टाद्वारे शुभेच्छापत्रे

आजच्या युगात इंटरनेट व मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला, तरी टपालाचे महत्त्व कायमच असल्याचे दिसून येते. त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा येथील शंकर विद्यालयाच्या ७ ते १० वयोगटातील विद्यार्थ्यांनी मानपाडा पोस्ट ऑफिसला नुकतीच भेट देऊन दिवाळीनिमित्त आपल्याच कुटुंबीयांना शुभेच्छापत्रे पाठविली.

Maharashtra Times 28 Oct 2016, 3:00 am
डोंबिवली ः आजच्या युगात इंटरनेट व मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला, तरी टपालाचे महत्त्व कायमच असल्याचे दिसून येते. त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा येथील शंकर विद्यालयाच्या ७ ते १० वयोगटातील विद्यार्थ्यांनी मानपाडा पोस्ट ऑफिसला नुकतीच भेट देऊन दिवाळीनिमित्त आपल्याच कुटुंबीयांना शुभेच्छापत्रे पाठविली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students sent greeting cards to their families by post
विद्यार्थ्यांनी पाठवली पोस्टाद्वारे शुभेच्छापत्रे


आजही सर्व बँकांचे एटीएम, महत्त्वाची कागदपत्रे, चेकबुक पोस्टाद्वारे पाठविण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर शंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानपाडा पोस्ट ऑफिसला भेट दिली. पोस्टाचे कामकाज कसे चालते, पत्रे किती प्रकारचे असतात, आजच्या काळात पोस्टाचे काय महत्त्व आहे, हे जाणून घेतले. तसेच या विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्या पत्त्यावर दिवाळी शुभेच्छापत्रे पाठविण्याचा आनंद लुटला. या उपक्रमात १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज