म. टा. वृत्तसेवा, मुरुड जंजिरा
काशीद समुद्रकिनारी पर्यटनाला आलेल्या पुण्यातील कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्याची कामगिरी जीवरक्षकांनी केली.
पुणे येथील धनकवडीजवळ असणारे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील १५ जण काशीद समुद्रकिनारी फिरावयास आले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हे सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. काही वेळातच यातील राजीव शर्मा, अक्षय जैन व अजय शर्मा हे तिघेही पोहता पोहता खोल समुद्रात ओढले गेले.
त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात करताच, त्यांच्या मित्रांनीही मदतीसाठी हाक मारली. त्याचवेळी समोर स्पीडबोटीत तैनात असणाऱ्या जीवरक्षकांनी अजिबात वेळ न दवडता त्यांच्याजवळ बोट नेली आणि सर्व जीवरक्षकांनी त्वरित समुद्रात उडी घेत या सर्वांना बोटीत चढवून सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिघांना सुखरूप पाहून सर्व मित्रांचाही जीव भांड्यात पडला.
जीवरक्षक राकेश रक्ते, दीपेश पवार, अमोल कासार, अनिल वाघमारे, भरत वाघमारे, सुनील वाघमारे या सर्वांचे काशीद ग्रामपंचायत सरपंच सविता वाळेकर, ग्रामसेवक अंकुश शेळके व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष आभार व्यक्त केले.
काशीद समुद्रकिनारी पर्यटनाला आलेल्या पुण्यातील कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्याची कामगिरी जीवरक्षकांनी केली.
पुणे येथील धनकवडीजवळ असणारे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील १५ जण काशीद समुद्रकिनारी फिरावयास आले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हे सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. काही वेळातच यातील राजीव शर्मा, अक्षय जैन व अजय शर्मा हे तिघेही पोहता पोहता खोल समुद्रात ओढले गेले.
त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात करताच, त्यांच्या मित्रांनीही मदतीसाठी हाक मारली. त्याचवेळी समोर स्पीडबोटीत तैनात असणाऱ्या जीवरक्षकांनी अजिबात वेळ न दवडता त्यांच्याजवळ बोट नेली आणि सर्व जीवरक्षकांनी त्वरित समुद्रात उडी घेत या सर्वांना बोटीत चढवून सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिघांना सुखरूप पाहून सर्व मित्रांचाही जीव भांड्यात पडला.
जीवरक्षक राकेश रक्ते, दीपेश पवार, अमोल कासार, अनिल वाघमारे, भरत वाघमारे, सुनील वाघमारे या सर्वांचे काशीद ग्रामपंचायत सरपंच सविता वाळेकर, ग्रामसेवक अंकुश शेळके व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष आभार व्यक्त केले.