म. टा. वृत्तसेवा, ठाणे
बेधडकपणे एक महिला सिव्हिल रुग्णालयातील प्रसूती कक्षात येते आणि नवजात अर्भकाचे अपहरण करून पसार होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याचा मागमूसही लागत नाही. या प्रकारानंतर सिव्हिलमधील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नियुक्ती करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांना अधिकार असतानाही सुरक्षारक्षक भरले जात नाहीत. पोलिस ऑडिट करून सुरक्षारक्षक नेमण्याविषयी आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचित केले आहे. आतापर्यंत १९ पत्रे सिव्हिल प्रशासनाला दिली असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात कायम रुग्णांची गर्दी दिसून येते. त्यामुळे सिव्हिलची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करणे खूप गरजेचे आहे. शिवाय अनेकदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाकांच्या रोषालादेखील डॉक्टरांना सामना करावा लागतो. मध्यंतरी रुग्णालयातील एका शिकाऊ डॉक्टरला मारहाण झाली होती. या घटनेनंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र सुरक्षिततेच्या हमीनंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला होता. या शिवाय सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात खासगी गाड्याही पार्क केल्या जात असल्याचे समजते. तसेच काही दिवसांपूर्वी सिव्हिलमध्ये चोरीदेखील झाली होती. त्यात आता नवजात अर्भकाच्या अपहरणाच्या घटनेनंतर सिव्हिलमध्ये सुरक्षाव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सिव्हिलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच, सुरक्षारक्षकही सिव्हिलमध्ये असणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. सिव्हिलमधील सुरक्षारक्षकांची मंजूर पदे चार आहेत. त्यात दोघे सेवानिवृत्त झाले आहेत. सिव्हिलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून रुग्णांसह सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सिव्हिलमध्ये सुरक्षारक्षकांची खूपच आवश्यकता आहे. मात्र सिव्हिल प्रशासनाला याचे काहीच सोयरसूतक नाही.
विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक घेण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना अधिकार देण्यात आले आहेत. शिवाय सुरक्षारक्षक भरण्याविषयी ते निविदाही काढू शकतात. मात्र या अधिकाराचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सिव्हिल प्रशासनाकडून आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे ५० सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समजते. मात्र इतके सुरक्षारक्षक मिळणे अशक्य आहे. मात्र, सिव्हिलमधील सुरक्षिततेचे ऑडिट करून त्या प्रमाणात सुरक्षारक्षक भरण्याविषयी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सिव्हिल प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. ऑडिट करून आवश्यक सुरक्षारक्षक तुमच्या स्तरावर नेमण्यात यावेत, असेही सांगण्यात आले आहे. मात्र सिव्हिल प्रशासनाने या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त काहीच केले नसल्याचे समजते. ५ जानेवारी रोजी एक पत्र सिव्हिल रुग्णालयाला देण्यात आले होते, असेही कळते. या पत्रकाची दखल वेळीच सिव्हिल प्रशासनाने घेतली असती तर नवजात अर्भकाचे अपहरण टळले असते किंवा वेळीच ही बाब समोर आली असती. अशा प्रकारे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून मागील काही दिवसांत १९ वेळा पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे.
बेधडकपणे एक महिला सिव्हिल रुग्णालयातील प्रसूती कक्षात येते आणि नवजात अर्भकाचे अपहरण करून पसार होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याचा मागमूसही लागत नाही. या प्रकारानंतर सिव्हिलमधील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नियुक्ती करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांना अधिकार असतानाही सुरक्षारक्षक भरले जात नाहीत. पोलिस ऑडिट करून सुरक्षारक्षक नेमण्याविषयी आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचित केले आहे. आतापर्यंत १९ पत्रे सिव्हिल प्रशासनाला दिली असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात कायम रुग्णांची गर्दी दिसून येते. त्यामुळे सिव्हिलची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करणे खूप गरजेचे आहे. शिवाय अनेकदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाकांच्या रोषालादेखील डॉक्टरांना सामना करावा लागतो. मध्यंतरी रुग्णालयातील एका शिकाऊ डॉक्टरला मारहाण झाली होती. या घटनेनंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र सुरक्षिततेच्या हमीनंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला होता. या शिवाय सिव्हिल रुग्णालयाच्या परिसरात खासगी गाड्याही पार्क केल्या जात असल्याचे समजते. तसेच काही दिवसांपूर्वी सिव्हिलमध्ये चोरीदेखील झाली होती. त्यात आता नवजात अर्भकाच्या अपहरणाच्या घटनेनंतर सिव्हिलमध्ये सुरक्षाव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सिव्हिलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच, सुरक्षारक्षकही सिव्हिलमध्ये असणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. सिव्हिलमधील सुरक्षारक्षकांची मंजूर पदे चार आहेत. त्यात दोघे सेवानिवृत्त झाले आहेत. सिव्हिलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून रुग्णांसह सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सिव्हिलमध्ये सुरक्षारक्षकांची खूपच आवश्यकता आहे. मात्र सिव्हिल प्रशासनाला याचे काहीच सोयरसूतक नाही.
विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक घेण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना अधिकार देण्यात आले आहेत. शिवाय सुरक्षारक्षक भरण्याविषयी ते निविदाही काढू शकतात. मात्र या अधिकाराचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सिव्हिल प्रशासनाकडून आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे ५० सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समजते. मात्र इतके सुरक्षारक्षक मिळणे अशक्य आहे. मात्र, सिव्हिलमधील सुरक्षिततेचे ऑडिट करून त्या प्रमाणात सुरक्षारक्षक भरण्याविषयी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सिव्हिल प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. ऑडिट करून आवश्यक सुरक्षारक्षक तुमच्या स्तरावर नेमण्यात यावेत, असेही सांगण्यात आले आहे. मात्र सिव्हिल प्रशासनाने या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त काहीच केले नसल्याचे समजते. ५ जानेवारी रोजी एक पत्र सिव्हिल रुग्णालयाला देण्यात आले होते, असेही कळते. या पत्रकाची दखल वेळीच सिव्हिल प्रशासनाने घेतली असती तर नवजात अर्भकाचे अपहरण टळले असते किंवा वेळीच ही बाब समोर आली असती. अशा प्रकारे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून मागील काही दिवसांत १९ वेळा पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे.