'केडीएमसी’पाठोपाठ थकबाकीदार व्यापाऱ्यांविरूद्ध अजब हत्यार
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, कचरामुक्त ठाणे’ अशी टॅगलाइन घेत शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणाऱ्या ठाणे महापालिकेने गुरूवारी अक्षरशः कहर केला. ठाण्यातील व्यापाऱ्यानी घनकचरा शुल्क भरले नाही, म्हणून त्यांच्या दुकानांसमोर चक्क कत्तलखान्यांतील मांसमच्छीचा कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यानी फेकला. या प्रकारामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.
ठाणे महापालिकेने एप्रिल, २०१६पासून घनकचरा शुल्काची स्वतंत्र वसुली सुरू केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडून प्रति दिन २५ रुपयांप्रमाणे ही कर आकारणी होत आहे. वर्षाकाठी ९ हजार रुपये कर भरावा लागणार असल्याने बहुसंख्य व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. मार्च संपत असताना पालिका प्रशासन महसूल वाढविण्यासाठी भलतेच आक्रमक झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षांत २० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात वसुली फक्त ५४ लाख झाली असून उर्वरित वसुलीसाठी पालिकेने कायदेशीर कारवाईचे हत्यार सोडून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर कचरा फेकून त्यांची कोंडी करण्याचा अजब प्रकार सुरू केला आहे.
गोखले रोड, राम मारूती रोड, कोपरी तसेच, घोडबंदर परिसरातील काही रस्त्यांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास कचरा फेकला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी हा कचरा पाहिला. त्यात चक्क मांसमच्छीचे तुकडे आणि मेलेले उंदीर असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली. बहुसंख्य व्यापारी हे जैन समाजाचे असून दुकानांसमोर मांसमच्छी टाकल्यामुळे त्यांचा पारा भलताच चढला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा उचलण्यास नकार दिल्यानंतर नगरसेवक संजय वाघुले आणि काही व्यापाऱ्यांनी तो कचरा उचलून नौपाडा प्रभाग समिती कार्यालयासमोर टाकला.
आयुक्त या भागाची प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडणार नाही असा पवित्रा काही व्यापाऱ्यानी घेतला. व्यापारी करभरणा करत नसतील, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई पालिकेने करायला हवी होती. अशा पध्दतीने कचरा फेकून पालिकेने आपल्या बेजबाबदार कार्यपध्दतीचे दर्शन घडविल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. हा प्रकार समजल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के यांनीसुध्दा व्यापाऱ्यांची भेट घेऊन या कराबाबत प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रशासनाची कचराफेक चुकीचीच असून त्यामुळे सर्वसामान्यांनाही त्रास सोसावा लागल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पालिकेविरोधात तक्रार
व्हिडीओमध्ये पालिकेचे कर्मचारी स्पष्ट दिसत आहेत. त्या पुराव्यांसह काही व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली होती.
कुरघोडीचे राजकारण
पालिकेच्या भूमिकेविरोधात व्यापाऱ्यांनी दुपारपासून महापालिका मुख्यालयात ठिय्या दिला. अखेर ज्या कोणी कचरा टाकला, त्यांची चौकशी करून शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यालयात सेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले. व्यापाऱ्यांनी मात्र शिवसेनेसोबत राहणे पसंत केले.
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, कचरामुक्त ठाणे’ अशी टॅगलाइन घेत शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणाऱ्या ठाणे महापालिकेने गुरूवारी अक्षरशः कहर केला. ठाण्यातील व्यापाऱ्यानी घनकचरा शुल्क भरले नाही, म्हणून त्यांच्या दुकानांसमोर चक्क कत्तलखान्यांतील मांसमच्छीचा कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यानी फेकला. या प्रकारामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. संतापलेल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.
ठाणे महापालिकेने एप्रिल, २०१६पासून घनकचरा शुल्काची स्वतंत्र वसुली सुरू केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडून प्रति दिन २५ रुपयांप्रमाणे ही कर आकारणी होत आहे. वर्षाकाठी ९ हजार रुपये कर भरावा लागणार असल्याने बहुसंख्य व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. मार्च संपत असताना पालिका प्रशासन महसूल वाढविण्यासाठी भलतेच आक्रमक झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षांत २० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात वसुली फक्त ५४ लाख झाली असून उर्वरित वसुलीसाठी पालिकेने कायदेशीर कारवाईचे हत्यार सोडून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर कचरा फेकून त्यांची कोंडी करण्याचा अजब प्रकार सुरू केला आहे.
गोखले रोड, राम मारूती रोड, कोपरी तसेच, घोडबंदर परिसरातील काही रस्त्यांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास कचरा फेकला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी हा कचरा पाहिला. त्यात चक्क मांसमच्छीचे तुकडे आणि मेलेले उंदीर असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली. बहुसंख्य व्यापारी हे जैन समाजाचे असून दुकानांसमोर मांसमच्छी टाकल्यामुळे त्यांचा पारा भलताच चढला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा उचलण्यास नकार दिल्यानंतर नगरसेवक संजय वाघुले आणि काही व्यापाऱ्यांनी तो कचरा उचलून नौपाडा प्रभाग समिती कार्यालयासमोर टाकला.
आयुक्त या भागाची प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडणार नाही असा पवित्रा काही व्यापाऱ्यानी घेतला. व्यापारी करभरणा करत नसतील, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई पालिकेने करायला हवी होती. अशा पध्दतीने कचरा फेकून पालिकेने आपल्या बेजबाबदार कार्यपध्दतीचे दर्शन घडविल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. हा प्रकार समजल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृहनेते नरेश म्हस्के यांनीसुध्दा व्यापाऱ्यांची भेट घेऊन या कराबाबत प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रशासनाची कचराफेक चुकीचीच असून त्यामुळे सर्वसामान्यांनाही त्रास सोसावा लागल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पालिकेविरोधात तक्रार
व्हिडीओमध्ये पालिकेचे कर्मचारी स्पष्ट दिसत आहेत. त्या पुराव्यांसह काही व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली होती.
कुरघोडीचे राजकारण
पालिकेच्या भूमिकेविरोधात व्यापाऱ्यांनी दुपारपासून महापालिका मुख्यालयात ठिय्या दिला. अखेर ज्या कोणी कचरा टाकला, त्यांची चौकशी करून शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यालयात सेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले. व्यापाऱ्यांनी मात्र शिवसेनेसोबत राहणे पसंत केले.