ठाणे : पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पत्नीने एका महिलेवर उकळलेले तेल ओतले होते. ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असून, आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. उकळलेले तेल अंगावर ओतल्याने यात होरपळलेल्या महिलेला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना, ६ मार्च रोजी त्या जखमी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी, १५ मार्च रोजी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर ४ परिसरात राहणाऱ्या मनीषाचे (वय ३०) आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिच्या अंगावर गीता यादव (वय ३६) हिने उकळते तेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. त्यात मनीषा गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर मनीषाला तेथील स्थानिक रहिवाशांनी तात्काळ कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना ६ मार्च रोजी मृत्यू झाला. मनीषाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने वर्तकनगर पोलीस ठाण्यात १५ मार्च रोजी गीता यादव हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गीताविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करत, पुढील तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी गीता यादव हिला अद्याप अटक झाली नसून, तिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी सांगितले.
काय घडले नेमके?
पतीसोबत मनीषाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय गीता यादव हिच्या मनात होता. त्यामुळे मनीषाचा 'काटा' काढण्यासाठी गीता हिने तिला स्वयंपाक बनवण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यावेळी घरी पुरीभाजीचा बेत करण्यात आला. पुरी तळण्यासाठी गीता हिने तेल कढईमध्ये ओतले. कढईतील तेल उकळल्यानंतर गीता हिने ते मनीषाच्या अंगावर ओतले आणि त्यात मनीषा होरपळली.
दोन महिन्यांपूर्वी मनीषासोबत ही घटना घडली होती. मात्र जखमी झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. त्याचवेळी गीता हिच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र घटनेनंतर पोलीस मनीषा हिचा जबाब घेण्यासाठी गेले असता, मनीषाने आपला जबाब नोंदवला नसल्यामुळे, अद्याप गीताविरोधात कुठलीही कारवाई झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु, ६ तारखेला मृत्यू झाल्यानंतर ९ दिवसांनी म्हणजेच, १५ तारखेला तक्रार दाखल केली जाते. त्यामुळे या प्रकरणात एक प्रकारचा संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले.
ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर ४ परिसरात राहणाऱ्या मनीषाचे (वय ३०) आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिच्या अंगावर गीता यादव (वय ३६) हिने उकळते तेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. त्यात मनीषा गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर मनीषाला तेथील स्थानिक रहिवाशांनी तात्काळ कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना ६ मार्च रोजी मृत्यू झाला. मनीषाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने वर्तकनगर पोलीस ठाण्यात १५ मार्च रोजी गीता यादव हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गीताविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करत, पुढील तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी गीता यादव हिला अद्याप अटक झाली नसून, तिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी सांगितले.
काय घडले नेमके?
पतीसोबत मनीषाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय गीता यादव हिच्या मनात होता. त्यामुळे मनीषाचा 'काटा' काढण्यासाठी गीता हिने तिला स्वयंपाक बनवण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यावेळी घरी पुरीभाजीचा बेत करण्यात आला. पुरी तळण्यासाठी गीता हिने तेल कढईमध्ये ओतले. कढईतील तेल उकळल्यानंतर गीता हिने ते मनीषाच्या अंगावर ओतले आणि त्यात मनीषा होरपळली.
दोन महिन्यांपूर्वी मनीषासोबत ही घटना घडली होती. मात्र जखमी झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. त्याचवेळी गीता हिच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र घटनेनंतर पोलीस मनीषा हिचा जबाब घेण्यासाठी गेले असता, मनीषाने आपला जबाब नोंदवला नसल्यामुळे, अद्याप गीताविरोधात कुठलीही कारवाई झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु, ६ तारखेला मृत्यू झाल्यानंतर ९ दिवसांनी म्हणजेच, १५ तारखेला तक्रार दाखल केली जाते. त्यामुळे या प्रकरणात एक प्रकारचा संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले.