म. टा. वृत्तसेवा, ठाणे
हातात भगवे झेंडे... डोक्यावर भगव्या टोप्या... भगवे टीशर्ट परिधान करून कोणी बाइक, कोणी कारने तर लोकलने जात मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईत धडक दिली. मुंबईला जाण्यासाठी ठाणे आणि पनवेल, खारघर तसेच नवी मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मराठा बांधवांनी एकच गर्दी झाली होती. ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे फलकही झळकत होते. सकाळी ठाण्यातील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर झालेली वाहतूककोंडी वगळता शहरात कोणतीही गडबड झाली नाही.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे तसेच नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्रीपासूनच मराठा बांधव मुंबईला जाण्यास सुरुवात झाली होती. नाशिक, परभणी आदी वेगवेगळ्या ठिकाणचे मराठी बांधवही ठाण्यामार्गे मुंबईला धडकले होते. भगवे झेंडे लावलेल्या गाड्या ठाणे, नवी मुंबईत दाखल होत होत्या. ठाण्यातील आनंदनगर जकात नाका, तसेच हायवेच्या बाजूला अल्पोपहाराचे वाटप करण्यात येत होते. रेल्वे स्थानकाबाहेरही पाण्याची सोय करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चामुळे सकाळी नेहमीपेक्षा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्यांची संख्या वाढली. परिणामी, गाड्या संथगतीने पुढे सरकत होत्या. परिणामी, हायवेवर काहीवेळ वाहतूककोंडी झाली होती.
बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून राज्यातील विविध भागांतून मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले मराठा बांधव नवी मुंबईतील जिल्हानिहाय नमूद ठिकाणी दाखल होऊ लागले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी गटागटाने हार्बर मार्गावरून रेल्वेने प्रवास करीत मुंबईकडे वाटचाल केली. सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक पोलिसांना नियुक्त करण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर टोलमध्ये सूट देण्यात आली होती. पार्किंगच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट, मोर्चेकरांच्या सेवेसाठी डॉक्टरांची टीम व स्वयंसेवक यावेळी ठिकठिकाणी नेमण्यात आले होते. दुपारी ११ वाजेपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमधून मोर्चेकरी मोठ्या संख्येने रवाना होत होते. नवी मुंबईत २०० पोलिस अधिकारी आणि १२५० पोलिस कर्मचारी तैनात होते. नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर, सायन पनवेल महामार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोठेही वाहतूककोंडी झाली नाही. सानपाडा येथे सायन-पनवेल महामार्गावर उड्डाणपुलाखाली तसेच दत्त मंदिर परिसरासोबतच एपीएमसी मार्केटमधील कांदा बटाटा मार्केट, मसाला मार्केटच्या आवारात विविध जिल्ह्यांतून आलेल्या वाहनाच्या पार्किंगची सोय केली होती.
खारघरमधील भव्य सेंट्रल पार्क परिसरात मैदानावर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या मोर्चेकरांची वाहने ठेवण्याची व्यवस्था केली होती. मात्र खारघर रेल्वे स्थानकातून ही जागा पायी पाच किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी वाहन पार्क करणे शक्य झाले नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा तिथे होत्या.
बाजार समितीमधील व्यवहार बंद
मराठा मोर्च्यासाठी माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यामुळे बुधवारी बाजारात मालाची चढ उतार करण्याचे काम करण्यासाठी माथाडी कामगार नसल्याने बाजारातील सर्व व्यवहार बंद झाले होते.
हातात भगवे झेंडे... डोक्यावर भगव्या टोप्या... भगवे टीशर्ट परिधान करून कोणी बाइक, कोणी कारने तर लोकलने जात मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चासाठी मुंबईत धडक दिली. मुंबईला जाण्यासाठी ठाणे आणि पनवेल, खारघर तसेच नवी मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मराठा बांधवांनी एकच गर्दी झाली होती. ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे फलकही झळकत होते. सकाळी ठाण्यातील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर झालेली वाहतूककोंडी वगळता शहरात कोणतीही गडबड झाली नाही.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे तसेच नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्रीपासूनच मराठा बांधव मुंबईला जाण्यास सुरुवात झाली होती. नाशिक, परभणी आदी वेगवेगळ्या ठिकाणचे मराठी बांधवही ठाण्यामार्गे मुंबईला धडकले होते. भगवे झेंडे लावलेल्या गाड्या ठाणे, नवी मुंबईत दाखल होत होत्या. ठाण्यातील आनंदनगर जकात नाका, तसेच हायवेच्या बाजूला अल्पोपहाराचे वाटप करण्यात येत होते. रेल्वे स्थानकाबाहेरही पाण्याची सोय करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चामुळे सकाळी नेहमीपेक्षा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्यांची संख्या वाढली. परिणामी, गाड्या संथगतीने पुढे सरकत होत्या. परिणामी, हायवेवर काहीवेळ वाहतूककोंडी झाली होती.
बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून राज्यातील विविध भागांतून मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले मराठा बांधव नवी मुंबईतील जिल्हानिहाय नमूद ठिकाणी दाखल होऊ लागले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी गटागटाने हार्बर मार्गावरून रेल्वेने प्रवास करीत मुंबईकडे वाटचाल केली. सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक पोलिसांना नियुक्त करण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर टोलमध्ये सूट देण्यात आली होती. पार्किंगच्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट, मोर्चेकरांच्या सेवेसाठी डॉक्टरांची टीम व स्वयंसेवक यावेळी ठिकठिकाणी नेमण्यात आले होते. दुपारी ११ वाजेपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमधून मोर्चेकरी मोठ्या संख्येने रवाना होत होते. नवी मुंबईत २०० पोलिस अधिकारी आणि १२५० पोलिस कर्मचारी तैनात होते. नवी मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर, सायन पनवेल महामार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोठेही वाहतूककोंडी झाली नाही. सानपाडा येथे सायन-पनवेल महामार्गावर उड्डाणपुलाखाली तसेच दत्त मंदिर परिसरासोबतच एपीएमसी मार्केटमधील कांदा बटाटा मार्केट, मसाला मार्केटच्या आवारात विविध जिल्ह्यांतून आलेल्या वाहनाच्या पार्किंगची सोय केली होती.
खारघरमधील भव्य सेंट्रल पार्क परिसरात मैदानावर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या मोर्चेकरांची वाहने ठेवण्याची व्यवस्था केली होती. मात्र खारघर रेल्वे स्थानकातून ही जागा पायी पाच किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी वाहन पार्क करणे शक्य झाले नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा तिथे होत्या.
बाजार समितीमधील व्यवहार बंद
मराठा मोर्च्यासाठी माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यामुळे बुधवारी बाजारात मालाची चढ उतार करण्याचे काम करण्यासाठी माथाडी कामगार नसल्याने बाजारातील सर्व व्यवहार बंद झाले होते.