म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाणे रेल्वे स्टेशनात कल्याणच्या दिशेकडे उभारण्यात येणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडले असून या कामासाठी रेल्वे स्टेशनातील पत्रेही काढण्यात आल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तर, दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशनातील मुंबईच्या दिशेकडे उभारण्यात येणाऱ्या नव्या पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरीही या पादचारी पुलाचे काम बंद पडल्याने होणाऱ्या नाहक त्रासापायी प्रवासी हैराण झाले आहेत.
रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांचे होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर १०० कोटी रुपये खर्चून तब्बल ३६ पादचारी पूल दोन वर्षांत बांधले जाणार होते. रेल्वे अपघातात वर्षागणिक हजारो मृत्यू होतात. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पादचारी पुलांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तसेच स्थानिक पालिकांच्या साहाय्याने मध्य रेल्वेने पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनावर रेल्वे पादचारी पुलांची नितांत आवश्यकता असल्याने प्रशासनाकडून येथे नव्या दोन रेल्वे पादचारी पुलांची उभारणी करण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. यातील ठाणे स्थानकामधील मुंबईच्या दिशेकडे एमआरव्हीसीतर्फे उभारला जाणारा रेल्वे पादचारी पूल सध्या अंतिम टप्प्यात आहे. तसेच, हा बहुतांश भाग रेल्वे फलाटाच्या बाहेरील भागात असल्याने फलाट क्रमांक एकचा अपवाद वगळता अन्यत्र कोठेही मोठ्या प्रमाणात पत्रे काढण्याची गरज प्रशासनाला उद्भवली नाही. मात्र मध्य रेल्वेकडून ठाणे स्टेशनात कल्याण दिशेकडे उभारल्या जाणाऱ्या रेल्वे पादचारी पुलासाठी दोन ते सहा फलाटावरील पत्रे मागील काही महिन्यांपासून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे फलाटावरील वायरही लोंबकळत असून कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना याठिकाणी तिष्ठत राहावे लागत आहे. मात्र तरीही कोणत्याही प्रकारे संबंधित पादचारी पुलाचे काम पुढे सरकण्याचे नावच घेत नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहण्यावाचून पर्यायच उपलब्ध नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.
काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या पादचारी पुलाचे खांबही आता धूळखात पडल्याने गंजू लागले आहेत. लटकणाऱ्या वायरींमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच, फलाट क्रमांक दोननजीक जुन्या स्वछतागृहाजवळ असलेल्या संबंधित पुलाच्या खांबाखाली रॅबिटही जमा झाले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. - नंदकुमार देशमुख,
अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना
ठाणे रेल्वे स्टेशनात कल्याणच्या दिशेकडे उभारण्यात येणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडले असून या कामासाठी रेल्वे स्टेशनातील पत्रेही काढण्यात आल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तर, दुसरीकडे ठाणे रेल्वे स्टेशनातील मुंबईच्या दिशेकडे उभारण्यात येणाऱ्या नव्या पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरीही या पादचारी पुलाचे काम बंद पडल्याने होणाऱ्या नाहक त्रासापायी प्रवासी हैराण झाले आहेत.
रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांचे होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर १०० कोटी रुपये खर्चून तब्बल ३६ पादचारी पूल दोन वर्षांत बांधले जाणार होते. रेल्वे अपघातात वर्षागणिक हजारो मृत्यू होतात. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पादचारी पुलांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तसेच स्थानिक पालिकांच्या साहाय्याने मध्य रेल्वेने पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे रेल्वे स्टेशनावर रेल्वे पादचारी पुलांची नितांत आवश्यकता असल्याने प्रशासनाकडून येथे नव्या दोन रेल्वे पादचारी पुलांची उभारणी करण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. यातील ठाणे स्थानकामधील मुंबईच्या दिशेकडे एमआरव्हीसीतर्फे उभारला जाणारा रेल्वे पादचारी पूल सध्या अंतिम टप्प्यात आहे. तसेच, हा बहुतांश भाग रेल्वे फलाटाच्या बाहेरील भागात असल्याने फलाट क्रमांक एकचा अपवाद वगळता अन्यत्र कोठेही मोठ्या प्रमाणात पत्रे काढण्याची गरज प्रशासनाला उद्भवली नाही. मात्र मध्य रेल्वेकडून ठाणे स्टेशनात कल्याण दिशेकडे उभारल्या जाणाऱ्या रेल्वे पादचारी पुलासाठी दोन ते सहा फलाटावरील पत्रे मागील काही महिन्यांपासून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे फलाटावरील वायरही लोंबकळत असून कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना याठिकाणी तिष्ठत राहावे लागत आहे. मात्र तरीही कोणत्याही प्रकारे संबंधित पादचारी पुलाचे काम पुढे सरकण्याचे नावच घेत नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहण्यावाचून पर्यायच उपलब्ध नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.
काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या पादचारी पुलाचे खांबही आता धूळखात पडल्याने गंजू लागले आहेत. लटकणाऱ्या वायरींमुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच, फलाट क्रमांक दोननजीक जुन्या स्वछतागृहाजवळ असलेल्या संबंधित पुलाच्या खांबाखाली रॅबिटही जमा झाले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. - नंदकुमार देशमुख,
अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना