म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ठाणे ग्रामीणच्या हद्दीत गुन्हेगारीने कळस गाठला असून मागील दहा महिन्यांत तब्बल ३ हजार ८७५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याच कालावधीत सन २०१७ मध्ये २ हजार ९९० गुन्ह्यांची नोंद झाली होती. चालू वर्षात गुन्ह्यात ८८५ने वाढ झाली असून गुन्हेगारीवर अंकुश आणण्यात ठाणे ग्रामीण पोलिस अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणाखाली असून 'पोलिस सुस्त आणि गुन्हेगार मस्त' अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
पालघर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांची संख्या घटली. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे ग्रामीणच्या परिसरावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्ह्यांची उकल केली जाते. ग्रामीणच्या हद्दीत वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांची आडकेवारी पाहता मिरा-भाईंदरसाठी नवीन पोलिस आयुक्तालय स्थापण्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. मात्र आयुक्तालय केव्हा होणार हा प्रश्न अद्याप कायम असताना दुसरीकडे ठाणे ग्रामीणच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्यांचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत आहे. नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येईल यासाठी पोलिस विशेष प्रयत्न करतात. मात्र ठाणे ग्रामीणमधील गुन्ह्यांची परिस्थिती पाहता ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताही धाक राहिला नाही. महिन्याला सरासरी ३८७ गुन्हे दाखल होत असून या गुन्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोऱ्या, घरफोड्या, अपहरण, अपघात आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. चोऱ्या, घरफोडी यांची संख्या शेकडोच्या घरात असून सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी-जास्त प्रमाणात आहे. अशावेळी पोलिस असतात कोठे असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत ३ हजार ८७५ गुन्हे दाखल झाले असून ७४ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. याच कालावधीत मागील वर्षी २०१७ मध्ये २ हजार ९९० गुन्हे होते. तर ७३ टक्के गुन्ह्यांची उकल होऊ शकली होती. मागील आणि यंदाची तुलना केल्यास यावेळी गुन्ह्यात ८८५ने वाढ झालेली असून गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्येही गुन्हे वाढल्याचे चित्र आहे.
ठाणे ग्रामीणच्या हद्दीत लोकसंख्या वाढत असल्याने गुह्यांची संख्याही वाढत आहे. पूर्वी सर्वच गुन्हे दाखल होत नव्हते. मात्र आता पोलिस ठाण्यात तक्रार आली की तत्काळ गुन्हा दाखल केला जातो. नंतर गुन्ह्याचा तपास केला जातो. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण घटले
सोनसाखळी चोरट्यांचा ठाणे ग्रामीणच्या हद्दीतही सुळसुळाट झाला होता. मात्र पोलिसांनी चोरट्यांना केलेल्या अटकेमुळे काही प्रमाणात का होईना प्रमाण घटले आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये सोनसाखळी चोरीचे ६५ गुन्हे होते. यंदा गुन्ह्यांची संख्या ५३ इतकी आहे.
सर्वाधिक गुन्ह्यांचे वर्ष?
सन २०१६ मध्ये ३ हजार ८२८ आणि २०१७ मध्ये ३ हजार ७११ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल होते. चालू वर्ष संपण्यास अद्याप दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या चार हजार ओलांडून मागील सात वर्षांत २०१८ हे वर्ष सर्वाधिक गुन्ह्यांचे वर्ष ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे ग्रामीणच्या हद्दीत गुन्हेगारीने कळस गाठला असून मागील दहा महिन्यांत तब्बल ३ हजार ८७५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याच कालावधीत सन २०१७ मध्ये २ हजार ९९० गुन्ह्यांची नोंद झाली होती. चालू वर्षात गुन्ह्यात ८८५ने वाढ झाली असून गुन्हेगारीवर अंकुश आणण्यात ठाणे ग्रामीण पोलिस अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणाखाली असून 'पोलिस सुस्त आणि गुन्हेगार मस्त' अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.
पालघर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांची संख्या घटली. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे ग्रामीणच्या परिसरावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्ह्यांची उकल केली जाते. ग्रामीणच्या हद्दीत वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांची आडकेवारी पाहता मिरा-भाईंदरसाठी नवीन पोलिस आयुक्तालय स्थापण्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. मात्र आयुक्तालय केव्हा होणार हा प्रश्न अद्याप कायम असताना दुसरीकडे ठाणे ग्रामीणच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्यांचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत आहे. नागरिकांना भयमुक्त जीवन जगता येईल यासाठी पोलिस विशेष प्रयत्न करतात. मात्र ठाणे ग्रामीणमधील गुन्ह्यांची परिस्थिती पाहता ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताही धाक राहिला नाही. महिन्याला सरासरी ३८७ गुन्हे दाखल होत असून या गुन्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोऱ्या, घरफोड्या, अपहरण, अपघात आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. चोऱ्या, घरफोडी यांची संख्या शेकडोच्या घरात असून सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी-जास्त प्रमाणात आहे. अशावेळी पोलिस असतात कोठे असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत ३ हजार ८७५ गुन्हे दाखल झाले असून ७४ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. याच कालावधीत मागील वर्षी २०१७ मध्ये २ हजार ९९० गुन्हे होते. तर ७३ टक्के गुन्ह्यांची उकल होऊ शकली होती. मागील आणि यंदाची तुलना केल्यास यावेळी गुन्ह्यात ८८५ने वाढ झालेली असून गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्येही गुन्हे वाढल्याचे चित्र आहे.
ठाणे ग्रामीणच्या हद्दीत लोकसंख्या वाढत असल्याने गुह्यांची संख्याही वाढत आहे. पूर्वी सर्वच गुन्हे दाखल होत नव्हते. मात्र आता पोलिस ठाण्यात तक्रार आली की तत्काळ गुन्हा दाखल केला जातो. नंतर गुन्ह्याचा तपास केला जातो. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण घटले
सोनसाखळी चोरट्यांचा ठाणे ग्रामीणच्या हद्दीतही सुळसुळाट झाला होता. मात्र पोलिसांनी चोरट्यांना केलेल्या अटकेमुळे काही प्रमाणात का होईना प्रमाण घटले आहे. २०१७ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये सोनसाखळी चोरीचे ६५ गुन्हे होते. यंदा गुन्ह्यांची संख्या ५३ इतकी आहे.
सर्वाधिक गुन्ह्यांचे वर्ष?
सन २०१६ मध्ये ३ हजार ८२८ आणि २०१७ मध्ये ३ हजार ७११ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल होते. चालू वर्ष संपण्यास अद्याप दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या चार हजार ओलांडून मागील सात वर्षांत २०१८ हे वर्ष सर्वाधिक गुन्ह्यांचे वर्ष ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.