अंबरनाथ : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात सुरू केली आहे. दुसरीकडे रेल्वे वाहतूक व्यवस्था बंद असून, बस प्रवासात करोनाचा धोका वाढण्याच्या धास्तीने हजारो कर्मचाऱ्यांनी स्वतःचे वाहन घेऊन प्रवास करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशा परिस्थितीत आर्थिक ताळमेळ साधायचा कसा, अशी चिंता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सतावत आहेसरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसची सुविधा दिली असली तरी बसमधून शेकडो कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरांतून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी भागांत नोकरीसाठी जाणारे सरकारी कर्मचारी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या वाहनातून प्रवास करण्यास पसंती देत आहे. वेतन कपातीत हा खर्च वाढला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची कोंडी
राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात सुरू केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2020, 4:00 am