अ‍ॅपशहर

मुंब्र्यात वाहतूककोंडीची समस्या तीव्र

म टा वृत्तसेवा, ठाणेमुंब्र्यातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे...

Maharashtra Times 25 Jul 2018, 4:00 am

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

मुंब्र्यातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मात्र पालिका प्रशासन फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. फेरीवाल्यांची समस्या दूर करून मुंब्रावासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आव्हाड यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. तसेच वाहतूककोंडीबाबत त्यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचीही भेट घेतली.

मुंब्र्यातील मुख्य रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र मुख्य रस्त्यासह इतर सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. परिणामी वाहतूककोंडी होत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसल्याचा मुद्दाही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. येथील रस्त्यावर ना पोलिस दिसतात, ना फेरीवाल्यांवर कारवाई होते. पोलिसांना ज्यावेळी रस्ता मोकळा हवा असतो त्यावेळी पोलिस प्रयत्न करून मुंब्रा शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत ठेवतात. मात्र नंतर प्रशासन कुठे गायब होते कळतच नाही. यापूर्वी पालिकेचे एक अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाई करत होते. मात्र हा अधिकारी आता शांत झाला आहे. अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यावर कोणताच अधिकारी कारवाई करत नसल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारावरून मुंब्रा शहर बेवारस असल्यासारखे दिसत असल्याचेही आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज