गेले अडीच महिने वाढत्या करोना संकटाशी लढत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील महापालिका यंत्रणा व जिल्हा प्रशासनावर मंगळवार सायंकाळपासून निसर्ग चक्रीवादळासाठी सज्ज राहण्याची वेळ आली व उत्तनच्या किनारपट्टीपासून ते खाडीचे परिसर समुद्राच्या तोंडाशी असलेल्या नवी मुंबई परिसरासह विविध भागात तयारी करण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या वेशीपर्यंत येऊन थबकलेल्या चक्रीवादळाने ठाणे जिल्ह्यावर बुधवारी कृपादृष्टी दाखवली. पावसाने मात्र सर्वत्र हजेरी लावली. चक्रीवादळाच्या घोंघावत्या वाऱ्यांनी रायगडकडून नाशिककडे जाताना आपला हलकासा हिसका दुपारी दाखवला, त्यातही कित्येक ठिकाणी मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडले. १९२ वृक्ष जमीनदोस्त झाले व ३३ घरांचे नुकसान झाले. जीवितहानी मात्र टळली. करोनातून डोके वर काढू लागलेल्या बाजारपेठांना पुन्हा खीळ बसली
वादळाचा वळसा
गेले अडीच महिने वाढत्या करोना संकटाशी लढत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील महापालिका यंत्रणा व जिल्हा प्रशासनावर मंगळवार सायंकाळपासून निसर्ग ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2020, 4:00 am