ठाणे: भारत-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. 'भारताच्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला होता. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. 'सीमेच्या आत कुणी आलंच नसेल तर २० सैनिकांच्या हौतात्म्याची जबाबदारी कोणाची,' असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला आहे. (India-China Face Off)
वाचा: नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; शिवसेनेचा हल्लाबोल
भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचे किती नुकसान झाले याबाबत कुठलीही ठोस माहिती नाही. चिनी सैनिकांच्या मृत्यूबाबत त्या देशानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनचा एकही सैनिक मारला गेला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं भारतभर चीन विरोधात प्रचंड रोष आहे. विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना आश्वस्त केले होते. 'आपल्या हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. भारताची एकही सैनिकी पोस्ट कुणी ताब्यात घेतलेली नाही. शत्रूला धडा शिकवून आपले वीर जवान शहीद झाले आहेत,' असं मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. 'जर कुणी सीमेत घुसलं नाही, कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची,' असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
वाचा: 'सैनिकांच्या हातात काठ्या? देशाची सीमा म्हणजे RSS ची शाखा आहे का?'
काँग्रेसनेही मोदींच्या या खुलाशावर टीका केली आहे. 'आमच्या हद्दीत कुणीच घुसलेलं नाही हे पंतप्रधानांचं वक्तव्य चीनला नक्कीच फायद्याचं ठरेल,' अशी भीती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.
सोनियांनी धरलं सरकारला धारेवर
सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली. 'देशाला अंधारात ठेवलं जातंय. सरकारला प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) फोटो उपग्रहाद्वारे मिळत नाहीत का? बाहेरील गुप्तरच यंत्रणांनी LACवरील हालचालींबाबत कुठलीही माहिती दिली नाही का? लष्कराच्या गुप्तचर विभागाने काहीच माहिती कशी दिली नाही? गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे का?, असे प्रश्न सोनियांनी उपस्थित केले आहेत.
वाचा: नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; शिवसेनेचा हल्लाबोल
भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचे किती नुकसान झाले याबाबत कुठलीही ठोस माहिती नाही. चिनी सैनिकांच्या मृत्यूबाबत त्या देशानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनचा एकही सैनिक मारला गेला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं भारतभर चीन विरोधात प्रचंड रोष आहे. विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना आश्वस्त केले होते. 'आपल्या हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. भारताची एकही सैनिकी पोस्ट कुणी ताब्यात घेतलेली नाही. शत्रूला धडा शिकवून आपले वीर जवान शहीद झाले आहेत,' असं मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. 'जर कुणी सीमेत घुसलं नाही, कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची,' असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
वाचा: 'सैनिकांच्या हातात काठ्या? देशाची सीमा म्हणजे RSS ची शाखा आहे का?'
काँग्रेसनेही मोदींच्या या खुलाशावर टीका केली आहे. 'आमच्या हद्दीत कुणीच घुसलेलं नाही हे पंतप्रधानांचं वक्तव्य चीनला नक्कीच फायद्याचं ठरेल,' अशी भीती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.
सोनियांनी धरलं सरकारला धारेवर
सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली. 'देशाला अंधारात ठेवलं जातंय. सरकारला प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) फोटो उपग्रहाद्वारे मिळत नाहीत का? बाहेरील गुप्तरच यंत्रणांनी LACवरील हालचालींबाबत कुठलीही माहिती दिली नाही का? लष्कराच्या गुप्तचर विभागाने काहीच माहिती कशी दिली नाही? गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे का?, असे प्रश्न सोनियांनी उपस्थित केले आहेत.