कल्याण : मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम केडीएमसी बुधवारी हाती घेणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाण्याचा शटडाऊन घेतला जाणार आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या टिटवाळा, उंबर्णी, बल्याणी, मोहिली, जेतवननगर, तिपन्नानगर, गाळेगांव, गणेश कॉलनी, पंचशीलनगर, शास्त्रीनगर, फुलेनगर, मोहना, शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, वालधुनी, जोशीबाग व कल्याण स्थानक परिसरात पाणीपुरवठा केला जाणार नाही. या परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
कल्याणात उद्या पाणी नाही
मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम केडीएमसी बुधवारी हाती घेणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाण्याचा शटडाऊन घेतला जाणार आहे.
Maharashtra Times 31 Jul 2018, 1:58 am