म. टा. वृत्तसेवा, ठाणे
समान शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या राइट टू एज्युकेशन अर्थात आरटीई प्रक्रियेच्या नोंदणी प्रक्रियेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ मार्चपर्यंत लांबवण्यात आलेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल १२ हजार ४८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याने मुदतीअखेरिस हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नामांकित शाळेत सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या आरटीई योजनेची सुरुवात यंदा फेब्रुवारी महिन्यांपासून केली गेली. गेल्या वर्षी गोंधळाच्या ठरलेल्या प्रक्रियेत यंदा सहभागी शाळा आणि रिक्त जागा यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. शाळांनी सुरुवातीला नोंदणी करताना आढेवेढे घेतले असले तरी यंदा ६४० शाळांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे १६५९४ जागांसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या नावांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पालकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तांत्रिक अडचणींचा सामना करत नोंदणी करणाऱ्या या पालकांसाठी नोंदणीच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी, वारंवार बंद पडणारी वेबसाइट त्यामुळे पालकांचा होणारा खोळंबा या कारणांमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना ११ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे.
चार हजारांची वाढ
नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला असला तरी यामुळे नोंदणी करणाया विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे, आतापर्यंत तब्बल १२ हजार ४८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यासंख्येत तब्बल चार हजारांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी साडेआठ हजारांपैकी अवघ्या ४००२ विद्यार्थ्यांचे प्रव्श झाले होते. यंदा ही संख्या वाढल्याने अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ११ मार्चपर्यंत ही संख्या अधिक वाढेल असे दिसते. रिक्त जागांचा विचार करता सर्व विद्यार्थ्यांना विनासायास प्रवेश मिळणे शक्य आहे. मात्र शाळा आणि प्रशासनाचे सहकार्य असले तरच प्रवेश सुकर होतील असे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
समान शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या राइट टू एज्युकेशन अर्थात आरटीई प्रक्रियेच्या नोंदणी प्रक्रियेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ११ मार्चपर्यंत लांबवण्यात आलेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल १२ हजार ४८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याने मुदतीअखेरिस हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नामांकित शाळेत सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या आरटीई योजनेची सुरुवात यंदा फेब्रुवारी महिन्यांपासून केली गेली. गेल्या वर्षी गोंधळाच्या ठरलेल्या प्रक्रियेत यंदा सहभागी शाळा आणि रिक्त जागा यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. शाळांनी सुरुवातीला नोंदणी करताना आढेवेढे घेतले असले तरी यंदा ६४० शाळांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे १६५९४ जागांसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या नावांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पालकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. तांत्रिक अडचणींचा सामना करत नोंदणी करणाऱ्या या पालकांसाठी नोंदणीच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी, वारंवार बंद पडणारी वेबसाइट त्यामुळे पालकांचा होणारा खोळंबा या कारणांमुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना ११ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे.
चार हजारांची वाढ
नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला असला तरी यामुळे नोंदणी करणाया विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे, आतापर्यंत तब्बल १२ हजार ४८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यासंख्येत तब्बल चार हजारांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी साडेआठ हजारांपैकी अवघ्या ४००२ विद्यार्थ्यांचे प्रव्श झाले होते. यंदा ही संख्या वाढल्याने अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ११ मार्चपर्यंत ही संख्या अधिक वाढेल असे दिसते. रिक्त जागांचा विचार करता सर्व विद्यार्थ्यांना विनासायास प्रवेश मिळणे शक्य आहे. मात्र शाळा आणि प्रशासनाचे सहकार्य असले तरच प्रवेश सुकर होतील असे पालकांकडून सांगण्यात येत आहे.