अ‍ॅपशहर

टिटवाळ्यात तीन भावंडांचा बुडून मृत्यू

कल्याणजवळच्या टिटवाळ्यातील वासुंद्री नदीत पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज भाऊबीजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साईनाथ भोईर ( १६), नवीन भोईर (९) आणि संतोष भोईर (९) अशी मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत.

Maharashtra Times 1 Nov 2016, 9:35 pm
मटा ऑनलाइन वृत्त। कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three brothers drowned in the river of death in titwala near kalyan
टिटवाळ्यात तीन भावंडांचा बुडून मृत्यू


कल्याणजवळच्या टिटवाळ्यातील वासुंद्री नदीत पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज भाऊबीजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साईनाथ भोईर ( १६), नवीन भोईर (९) आणि संतोष भोईर (९) अशी मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत.

शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने भोईर कुटुंबातील हे तीन भाऊ चुलतभावासह आज दुपारच्या सुमाराला वासुंद्री नदीवर पोहायला गेले होते. पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी ते खोल पाण्यात बुडाले.

आपली मुलं संध्याकाळ झाली तरी देखील घरी आलेली नाहीत हे लक्षात आल्याने भोईर कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांना आपल्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे समजले.

बुडालेल्या भावंडांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा उपस्थितांची ह्रदये हेलावली. बुडत असताना या भावडांनी एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी एकमेकांचे हात घट्ट धरलेल्या अवस्थेतच या तिन्ही भावडांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आज संध्याकाळी सहाच्या सुमाराला हे मृतदेह बाहेर काढले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज