म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
कल्याण शहरामधून तीन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणमधील मुले बेपत्ता होण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आनंद राठोड, पूजा राठोड, सोनू राठोड अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नाव असून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
या मुलांचे पालक जवळच्याच रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला होते. शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर मुले घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूलाचौकशी केल्यानंतरही मुलांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर रात्रीपर्यंत शोध घेऊन अखेर पोलिसांकडे जाण्याचा पर्याय घरच्यांनी स्वीकारला. या मुलांना कोणी पळवून नेले आहे का, याबाबत पोलिस चाचपणी करत असून अद्याप तपास सुरू आहे.
कल्याण शहरामधून तीन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणमधील मुले बेपत्ता होण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आनंद राठोड, पूजा राठोड, सोनू राठोड अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नाव असून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
या मुलांचे पालक जवळच्याच रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला होते. शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर मुले घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूलाचौकशी केल्यानंतरही मुलांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर रात्रीपर्यंत शोध घेऊन अखेर पोलिसांकडे जाण्याचा पर्याय घरच्यांनी स्वीकारला. या मुलांना कोणी पळवून नेले आहे का, याबाबत पोलिस चाचपणी करत असून अद्याप तपास सुरू आहे.