म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील एका बिल्डरच्या मुलाच्या लग्नासाठी राजस्थानमधील जयपूर येथे चार्टर्ड विमानाने गेलेल्या २४० वऱ्हाडींपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालघर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची करोना तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले.
पालघर नगरपरिषदेमधील वेऊर येथील एका बिल्डरच्या मुलाचे राजस्थानमधील जयपूर येथे लग्न असल्याने पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यवसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८०हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. हे सर्व नागरिक एका चार्टर विमानाने जयपूर येथे गेल्याने, त्यांच्या विवाह समारंभात एकत्र वास्तव्य व वावर झाला. विवाह आटोपून हे सर्व जण १० मार्च रोजी पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना करोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे उघड झाले.
त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीची बैठक घेऊन संसर्ग झालेल्या या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतरांना करोनाचे संक्रमण झाले असण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षता म्हणून या सर्व वऱ्हाडींना पालघर ग्रामीण रुग्णालयात करोनाची तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये एक नगरसेवक असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे पालघर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन व तहसीलदार सुनील शिंदे यांनी सांगितले.
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील एका बिल्डरच्या मुलाच्या लग्नासाठी राजस्थानमधील जयपूर येथे चार्टर्ड विमानाने गेलेल्या २४० वऱ्हाडींपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालघर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे वर पित्याला सर्व वऱ्हाड्यांची करोना तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले.
पालघर नगरपरिषदेमधील वेऊर येथील एका बिल्डरच्या मुलाचे राजस्थानमधील जयपूर येथे लग्न असल्याने पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यवसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८०हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. हे सर्व नागरिक एका चार्टर विमानाने जयपूर येथे गेल्याने, त्यांच्या विवाह समारंभात एकत्र वास्तव्य व वावर झाला. विवाह आटोपून हे सर्व जण १० मार्च रोजी पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना करोनाच्या संसर्गाची बाधा झाल्याचे उघड झाले.
त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीची बैठक घेऊन संसर्ग झालेल्या या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतरांना करोनाचे संक्रमण झाले असण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षता म्हणून या सर्व वऱ्हाडींना पालघर ग्रामीण रुग्णालयात करोनाची तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये एक नगरसेवक असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे पालघर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन व तहसीलदार सुनील शिंदे यांनी सांगितले.