अ‍ॅपशहर

दुरवस्थेचे थांबे!

तुटलेले पत्रे... मार्ग क्रमांक, वेळापत्रक तसेच बसस्टॉपचे नाव नसणे... प्रवासी बसतात त्याठिकाणच्या जागेची बिकट अवस्था... केव्हाही बसस्टॉप कोसळण्याचा धोका... स्मार्ट सिटी असलेल्या ठाणे शहरातील टीएमटीचे बसस्टॉप हे दुरवस्थेचे थांबे बनले आहेत. रस्ता रुंदीकरणात सुमारे ६० ते ७० बसस्टॉप काढण्यात आले. मात्र पुन्हा ‘त्या’ जागेवर बसस्टॉप बसवण्याचे कष्ट घेण्यात आले नाहीत. बसस्टॉपच्या दुरवस्थेकडे कंत्राटदार लक्ष देत नाही आणि टीएमटी प्रशासनही ठोस पाऊले उचलत नसल्याने यामध्ये प्रवासी नाहक भरडला जात आहे.

Maharashtra Times 17 Sep 2017, 3:46 am
टीएमटीच्या अनेक बसस्टॉपना गैरसोयींचा विळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tmt busstops in bad conditions
दुरवस्थेचे थांबे!


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

तुटलेले पत्रे... मार्ग क्रमांक, वेळापत्रक तसेच बसस्टॉपचे नाव नसणे... प्रवासी बसतात त्याठिकाणच्या जागेची बिकट अवस्था... केव्हाही बसस्टॉप कोसळण्याचा धोका... स्मार्ट सिटी असलेल्या ठाणे शहरातील टीएमटीचे बसस्टॉप हे दुरवस्थेचे थांबे बनले आहेत. रस्ता रुंदीकरणात सुमारे ६० ते ७० बसस्टॉप काढण्यात आले. मात्र पुन्हा ‘त्या’ जागेवर बसस्टॉप बसवण्याचे कष्ट घेण्यात आले नाहीत. बसस्टॉपच्या दुरवस्थेकडे कंत्राटदार लक्ष देत नाही आणि टीएमटी प्रशासनही ठोस पाऊले उचलत नसल्याने यामध्ये प्रवासी नाहक भरडला जात आहे.

टीएमटीने ‘बांधा, वापर आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पालिका हद्दीतील ४७० ठिकाणी बसस्टॉप उभारण्याचे कंत्राट दिले आहे. सन २०१३मध्ये १० वर्षांसाठी हा करार करण्यात आला होता. करारनाम्यानुसार बसस्टॉपची देखभाल, दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी या कंत्राटदाराची आहे. ठाणे स्मार्ट होत असताना बसस्टॉपही चकाचक असतील तर कोणत्याही अडचणींविना प्रवासी बसस्टॉपमध्ये बसची प्रतीक्षा करत काही वेळ बसू शकतील. शिवाय ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांनाही दिलासा मिळेल. मात्र बसस्टॉपच्या बाबतीत चित्र उलट आहे. कारण अनेक बसस्टॉप केवळ नावालाच आहेत. स्टॉपवर बसण्यापेक्षा प्रवासी स्टॉपच्या बाहेरच उभे राहतात. कारण बसस्टॉप सुस्थितीत नसतो. ऊन, वारा, पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी बसस्टॉपच्या आश्रयाला गेल्यानंतर स्टॉपच्या छताचे पत्रे तुटलेले असतात किंवा त्यातून गळणाऱ्या पाण्याचा हमखास प्रवाशांना सामना करावा लागतो. त्यामुळे बसस्टॉप असून नसल्यासारखे आहेत. काही ठिकाणचे बसस्टॉप वाकलेही आहेत. लोकमान्य नगरचा बसस्टॉप तर केव्हाही कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. काही बसस्टॉपवर तर टीएमटीचे बोधचिन्हही नसते. परिणामी प्रवाशांची तारांबळ उडते.

रस्ता रुंदीकरणात सुमारे ६० ते ७० बसस्टॉप काढण्यात आले आहेत. मात्र रुंदीकरणाचे काम होऊनही बसस्टॉप पुन्हा त्याठिकाणी बसवले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. बसस्टॉप बसवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे टीएमटी प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र शहरातील अनेक बसस्टॉपची दुरवस्था होऊनही टीएमटी प्रशासनासह कंत्राटदारही दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करा

बसस्टॉपबाबत करारनाम्यातील अटी आणि शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिवहन समितीचे सभापती अनिल भोर यांनी परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे. १५० बसस्टॉपवर बसस्टॉपचे नाव नोंदवण्यात आलेले नाही. ७५ बसस्टॉपच्या दर्शनी भागाचा पत्रा तुटलेला असून १५० स्टॉपचा सीटचा पत्रा किंवा छपराचा पत्रा तुटलेला असल्याचेही भोर यांचे म्हणणे आहे. तसेच, काही ठिकाणी स्टेलनेस स्टीलऐवजी माइल्ड स्टोनचे बसस्टॉप उभारले असून ही एकप्रकारे फसवणूक असल्याचेच भोर यांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज