म. टा. खास प्रतिनिधी, कल्याण
राज्यात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली असली तरी कल्याण-डोंबिवलीतील अनेक व्यापारी व फेरीवाल्यांनी या बंदीला कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करताना पालिकेच्या पथकाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून काहीवेळा दंड वसूल करण्याऐवजी केवळ प्लास्टिक जप्त करण्यावरच समाधान मानावे लागत आहे. सोमवारी पालिकेच्या पथकाने प्लास्टिक बाळगणाऱ्या सात दुकानदारांवर कारवाई केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडून फक्त १७ हजार ५०० रुपये दंडच वसूल होऊ शकला. त्यामुळे मंगळवारपासून पालिका अशा विक्रेत्यांवर जोरदार कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.
प्लास्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी १० विक्रेत्यांनी प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी कारवाई करत केडीएमसीच्या पथकाने ५० हजार रुपये दंड वसूल केला होता. त्यामुळे सलग काही दिवस पालिकेचे प्रशासन या मोहिमेची व्याप्ती वाढवत कारवाई तीव्र करेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सोमवारी, दुसऱ्याच दिवशी या कारवाईचा जोर ओसरला.
सोमवारी सायंकाळपर्यंत पालिकेला फक्त सात विक्रेते प्लास्टिक पिशव्या बाळगताना आढळले. त्यामुळे या विक्रेत्यांकडून १७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मात्र प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल होणे अपेक्षित असताना जेमतेम निम्म्या विक्रेत्यांकडूनच दंड वसूल होऊ शकला. याबाबत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांना संपर्क साधला असता, त्यांनी अनेक ठिकाणी पालिकेच्या पथकाला विक्रेत्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. अनेकदा या पथकाशी प्लास्टिक बाळगणारे विक्रेते हुज्जत घालत असून दंडाची रक्कम भरण्यास नकार देत असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकवेळी वाद घालून दंड वसूल करणे शक्य नसल्याने सोमवारी दंडाची व कारवाईच्या प्रमाणात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत दोन दिवसांत ७३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती तोरस्कर यांनी दिली.
नेत्यांचे फोन
कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांना विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे पालिकेचे पथक कारवाईसाठी गेल्यावर त्यांना नेत्यांकडून फोन केला जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. या नेत्यांच्या धाकामुळे दंडात्मक कारवाई न करता केवळ विक्रेत्यांकडील प्लास्टिक जप्त करण्यावरच समाधान मानावे लागत आहे. प्लास्टिक बंदीवरून सर्वसामान्यांमध्ये अत्यंत समाधान व्यक्त होत असताना हे नेते त्याविरोधात का भूमिका घेत आहेत, असा सवाल केला जात आहे.
प्लास्टिक 'वेस्ट बँक'
ज्या नागरिक किंवा विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या असतील त्या जमा करता याव्यात, यासाठी महापालिकेने १० ठिकाणी प्लास्टिक वेस्ट बँक सुरू केल्या आहेत. सुभाष मैदान, आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड, स्वानंद नगर, बेतुरकर पाडा, ओक हायस्कूल, श्रीराम भुवन, पारनाका, समतोल इको वर्क्स, महात्मा गांधी रोड, हळबे व्यायामशाळा, मल उदंचन केंद्र, अण्णानगर (कोपर), मातोश्री ट्रस्ट - सोनारपाडा येथे ही बँक सुरू झाली असून तिथे या पिशव्या जमा कराव्यात, असे पालिकेने आवाहन केले आहे.
दोन दिवसांत ७३ किलो प्लास्टिक जप्त
१७ विक्रेत्यांवर कारवाई
दंडाची रक्कम ६७ हजार ५०० रुपये
राज्यात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली असली तरी कल्याण-डोंबिवलीतील अनेक व्यापारी व फेरीवाल्यांनी या बंदीला कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करताना पालिकेच्या पथकाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून काहीवेळा दंड वसूल करण्याऐवजी केवळ प्लास्टिक जप्त करण्यावरच समाधान मानावे लागत आहे. सोमवारी पालिकेच्या पथकाने प्लास्टिक बाळगणाऱ्या सात दुकानदारांवर कारवाई केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडून फक्त १७ हजार ५०० रुपये दंडच वसूल होऊ शकला. त्यामुळे मंगळवारपासून पालिका अशा विक्रेत्यांवर जोरदार कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.
प्लास्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी १० विक्रेत्यांनी प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी कारवाई करत केडीएमसीच्या पथकाने ५० हजार रुपये दंड वसूल केला होता. त्यामुळे सलग काही दिवस पालिकेचे प्रशासन या मोहिमेची व्याप्ती वाढवत कारवाई तीव्र करेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सोमवारी, दुसऱ्याच दिवशी या कारवाईचा जोर ओसरला.
सोमवारी सायंकाळपर्यंत पालिकेला फक्त सात विक्रेते प्लास्टिक पिशव्या बाळगताना आढळले. त्यामुळे या विक्रेत्यांकडून १७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मात्र प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल होणे अपेक्षित असताना जेमतेम निम्म्या विक्रेत्यांकडूनच दंड वसूल होऊ शकला. याबाबत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांना संपर्क साधला असता, त्यांनी अनेक ठिकाणी पालिकेच्या पथकाला विक्रेत्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. अनेकदा या पथकाशी प्लास्टिक बाळगणारे विक्रेते हुज्जत घालत असून दंडाची रक्कम भरण्यास नकार देत असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकवेळी वाद घालून दंड वसूल करणे शक्य नसल्याने सोमवारी दंडाची व कारवाईच्या प्रमाणात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत दोन दिवसांत ७३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती तोरस्कर यांनी दिली.
नेत्यांचे फोन
कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांना विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे पालिकेचे पथक कारवाईसाठी गेल्यावर त्यांना नेत्यांकडून फोन केला जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. या नेत्यांच्या धाकामुळे दंडात्मक कारवाई न करता केवळ विक्रेत्यांकडील प्लास्टिक जप्त करण्यावरच समाधान मानावे लागत आहे. प्लास्टिक बंदीवरून सर्वसामान्यांमध्ये अत्यंत समाधान व्यक्त होत असताना हे नेते त्याविरोधात का भूमिका घेत आहेत, असा सवाल केला जात आहे.
प्लास्टिक 'वेस्ट बँक'
ज्या नागरिक किंवा विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या असतील त्या जमा करता याव्यात, यासाठी महापालिकेने १० ठिकाणी प्लास्टिक वेस्ट बँक सुरू केल्या आहेत. सुभाष मैदान, आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड, स्वानंद नगर, बेतुरकर पाडा, ओक हायस्कूल, श्रीराम भुवन, पारनाका, समतोल इको वर्क्स, महात्मा गांधी रोड, हळबे व्यायामशाळा, मल उदंचन केंद्र, अण्णानगर (कोपर), मातोश्री ट्रस्ट - सोनारपाडा येथे ही बँक सुरू झाली असून तिथे या पिशव्या जमा कराव्यात, असे पालिकेने आवाहन केले आहे.
दोन दिवसांत ७३ किलो प्लास्टिक जप्त
१७ विक्रेत्यांवर कारवाई
दंडाची रक्कम ६७ हजार ५०० रुपये