म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाण्यातील फाऊंटन हॉटेलजवळ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपनीचा एक एलपीजी टँकर गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास उलटला. चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. या टँकरमधून वायूगळती होण्याची शक्यता असल्याने परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलीस आणि मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. उरण येथील बीपीसीएल कंपनीचे पथक पाच तासांनंतर दाखल झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली. या कालावधीत हजारो वाहनांना या कोंडीचा फटका बसला.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग घोडबंदर भागामध्ये अत्यंत अरुंद आहे. गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजता एलपीजीने भरलेला हा टँकर उलटला. यातील धोकादायक गॅसची गळती होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिसांनी हा परिसर वाहतुकीसाठी बंद केला. तसेच, या भागाकडे येणारी वाहतूक पर्यायी दिशेने वळविण्याचे प्रयत्न केले. उरण येथील कंपनीला याबाबत माहिती देण्यात आली. मात्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे या पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी पाच तासांहून अधिक काळ लागला. या काळात पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यास सुरुवात केली. नवी मुंबई, ठाण्याकडून अहमदाबाद आणि वसईकडे जाणारी वाहने भिवंडी मार्गावरून वळविण्यात आली. परंतु त्यामुळे भिवंडी बायपास मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे मुंब्रा बायपास बंद करावा लागला. एका बाजूला घोडबंदर रोड तर दुसरीकडे मुंब्रा बायपास बंद झाल्याने ठाण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची रखडपट्टी झाली.
अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालक आणि नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइल बंद करण्याचे आवाहन केले. एलपीजी हा ज्वालाग्रही असल्याने भ्रमणध्वनीमुळेही स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होते. घटनास्थळापासून वाहने दूर उभारण्यात आली होती.
रस्त्याची दुरवस्था कारणीभूत…
ठाण्यातील घोडबंदर रोडवर अवजड वाहने उलटण्याचे प्रकार सतत होत असून अरुंद रस्त्यांमुळे वाहतुक कोंडी होते. या भागातील तीव्र चढ, वळणे आणि दर्जाहीन रस्त्यांमुळेही अपघात घडत असल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत.
ठाण्यातील फाऊंटन हॉटेलजवळ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपनीचा एक एलपीजी टँकर गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास उलटला. चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. या टँकरमधून वायूगळती होण्याची शक्यता असल्याने परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलीस आणि मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. उरण येथील बीपीसीएल कंपनीचे पथक पाच तासांनंतर दाखल झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली. या कालावधीत हजारो वाहनांना या कोंडीचा फटका बसला.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग घोडबंदर भागामध्ये अत्यंत अरुंद आहे. गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजता एलपीजीने भरलेला हा टँकर उलटला. यातील धोकादायक गॅसची गळती होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिसांनी हा परिसर वाहतुकीसाठी बंद केला. तसेच, या भागाकडे येणारी वाहतूक पर्यायी दिशेने वळविण्याचे प्रयत्न केले. उरण येथील कंपनीला याबाबत माहिती देण्यात आली. मात्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे या पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी पाच तासांहून अधिक काळ लागला. या काळात पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यास सुरुवात केली. नवी मुंबई, ठाण्याकडून अहमदाबाद आणि वसईकडे जाणारी वाहने भिवंडी मार्गावरून वळविण्यात आली. परंतु त्यामुळे भिवंडी बायपास मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे मुंब्रा बायपास बंद करावा लागला. एका बाजूला घोडबंदर रोड तर दुसरीकडे मुंब्रा बायपास बंद झाल्याने ठाण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची रखडपट्टी झाली.
अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालक आणि नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइल बंद करण्याचे आवाहन केले. एलपीजी हा ज्वालाग्रही असल्याने भ्रमणध्वनीमुळेही स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होते. घटनास्थळापासून वाहने दूर उभारण्यात आली होती.
रस्त्याची दुरवस्था कारणीभूत…
ठाण्यातील घोडबंदर रोडवर अवजड वाहने उलटण्याचे प्रकार सतत होत असून अरुंद रस्त्यांमुळे वाहतुक कोंडी होते. या भागातील तीव्र चढ, वळणे आणि दर्जाहीन रस्त्यांमुळेही अपघात घडत असल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत.