कल्याण ः रासायनिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना हाताळत असलेल्या केमिकलच्या घातक क्षमतेबाबत अनेकदा माहिती नसल्यामुळे ती चुकीच्या पद्धतीने हाताळली जातात. यातून दुर्घटना घडत असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर प्रथमच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कामगारांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
एखाद्या केमिकलमुळे दुर्घटना घडली, तर तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, आग लागण्यास अग्निशमन यंत्र कशा प्रकारे हाताळावेत, प्लाण्टवर काम करताना कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरात विजय चंद्रात्रे यांनी कर्मचाऱ्यांना केले. या शिबिरात रासायनिक कंपन्यांमधील जवळपास ८०पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते. यात चंद्रात्रे यांनी केमिकल हाताळताना दुर्घटना होऊ नये, यासाठी काय करावे, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
एखाद्या केमिकलमुळे दुर्घटना घडली, तर तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, आग लागण्यास अग्निशमन यंत्र कशा प्रकारे हाताळावेत, प्लाण्टवर काम करताना कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरात विजय चंद्रात्रे यांनी कर्मचाऱ्यांना केले. या शिबिरात रासायनिक कंपन्यांमधील जवळपास ८०पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित होते. यात चंद्रात्रे यांनी केमिकल हाताळताना दुर्घटना होऊ नये, यासाठी काय करावे, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.