मध्य रेल्वेवरील प्रवासीगर्दीचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत असून रेल्वे रुळ ओलांडताना, गर्दीमुळे डब्यातून पडून आणि गर्दीमुळेही प्रवासी मृत्यमुखी पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाकडून स्थानकाची क्षमता वाढवण्यासाठी विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांमध्ये पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट आणि रेल्वे रूळ टाकण्याचीही कामे सुरू आहेत. ही कामे अनेकवेळा गर्दीच्या भागात आणि काही वेळा रेल्वे रुळांवरही सुरू असतात. एकीकडे रेल्वे वाहतूक सुरू असतानाच चालू असलेल्या या विकासकामांमुळे अपघाताची मोठी शक्यता निर्माण होते. रविवारी असाच प्रकार दिवा रेल्वे स्थानकात घडल्याचे समोर आले आहे. तेथे रेल्वेच्या कामादरम्यान भलामोठा साखळदंड रेल्वे रूळावर पडला. अशा प्रकारच्या हलगर्जीमुळे भीषण अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहे. रेल्वे सेवा बंद असताना अशी कामे केली जावीत. प्रवाशांच्या गर्दीच्या वेळामध्ये अवजड आणि धोकादायक पद्धतीने केली जाणारी कामे बंद ठेवावीत. अशा तऱ्हेने प्रवाशांच्या जीवाशी खेळणे अयोग्य आहे.
प्रवाशांच्या जिवाशी खेळ नको
मध्य रेल्वेवरील प्रवासीगर्दीचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत असून रेल्वे रुळ ओलांडताना, गर्दीमुळे डब्यातून पडून आणि गर्दीमुळेही प्रवासी मृत्यमुखी पडत ...
Maharashtra Times 31 May 2018, 4:00 am