अ‍ॅपशहर

आदिवासी मुलांना मदतीचा हात

रयत शिक्षण संस्थेच्या जव्हार व मोखाडा येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट विरार व अन्य सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी तालुक्यांत शैक्षण‌िक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Maharashtra Times 19 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribal children get education need
आदिवासी मुलांना मदतीचा हात


रयत शिक्षण संस्थेच्या जव्हार व मोखाडा येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट विरार व अन्य सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी तालुक्यांत शैक्षण‌िक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापली. या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्हातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात आश्रमशाळा चालविल्या जात आहेत. वसई तालुक्यातील अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या दुर्गम भागात शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुला-मुलींना मदतीचा हात म्हणून गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आश्रमशाळांमध्ये केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप गुरुवारी करण्यात आले.

या आश्रमशाळेतील व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळीबद्दलची माहिती व या कालावधीत घेण्यात येणाऱ्या सुरक्षिततेबद्दलची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता समेळ व मोरांडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पोशेरा उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी येले यांच्याकडून देण्यात आली. या शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटपही करण्यात आले. गेल्या काही दिवसांत या ट्रस्टमार्फत तीन लाख सॅनेटरी नॅपकीनचे वाटप जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना करण्यात आले आहे.

आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून वसई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ट्रस्ट व संस्थेमार्फत एकत्र येऊन त्यांना हा मदतीचा हात दिला आहे. या संस्थांमध्ये विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट, श्री मंगलमूर्ती मंदिर ट्रस्ट, भास्कर वामन चॅरिटेबल ट्रस्ट, यशवंत केशव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, तारामती हरिश्चंद्र ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, वाघोलीचे श्री शनि मंदिर ट्रस्ट, बोळींज येथील स्वयंभू महादेव मंदिर ट्रस्ट इ. सेवाभावी ट्रस्ट व संस्थांच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तूंचे वाटप सन २०१६पासून सुरू करण्यात आले आहे.

मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मोरांडा, पोशेरा, वाशाळा या शाळांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मोखाडा तसेच जिल्हा परिषदेची मोरखडक व साकुर्ली तसेच येथील रयत शिक्षण संस्थेच्या अनाथाश्रमातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना कपडे, ट्रॅक सूट, टॉवेल, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. कॅरम व बुद्धिबळ संचाचे वाटपही या विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील, महावीर कलेक्शनचे हरीषभाई धरोडा, सामाजिक कार्यकर्ते शेखर नाईक, चंदू पाटील, सुनील चोरघे, हरिश्चंद्र पाटील, जयवंत राऊत आदी कार्यकर्त्यांची फौज उपस्थित होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज