पालघर : वाडा तालुक्यातील कापरी येथील नदीत उन्हाळ्यातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तीन मुलींपैकी दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या एक मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
वाडा तालुक्यातील बिलघर ग्रामपंचायत हद्दीतील कापरी येथील नदीत डुंबण्यासाठी मानसी अनिल देसले (११), वेदिका संतोष आकरे (१३), दीक्षा संतोष आकरे या बुधवारी दुपारच्या सुमारास गेल्या होत्या. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने तिघीजणी पाण्यात बुडाल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मानसीचा घटनास्थळी, तर वेदिकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. बचावलेल्या दीक्षावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.