म. टा. वृत्तसेवा, ठाणे
पश्चिम बंगालमधून राज्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची तस्करी होत असल्याची बाब ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईतून पुढे आली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या पाच जणांना अटक केल्यानंतर बनावट नोटा महाराष्ट्रात पाठवणाऱ्या आणखी एकाला पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतले आहे. २ लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ५ लाखांच्या बनावट नोटा वटवण्यासाठी देण्यात येत होत्या.
भिवंडीतील वडपे येथील एका ढाब्यावर कारमधून आलेल्या रेहान अब्बास शेख (२२), साफद मुख्तार अन्सारी (१९), अनीस इक्लाख अन्सारी (१९), किशोर नामदेव फुलार (२५) आणि रोहित नागेंद्र सिंग (२३) यांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवड्यात येथील पानटपरीवर दोन हजाराची बनावट नोट वटवताना रंगेहात पकडले होते. यावेळी आरोपींकडून २ हजारांच्या तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांच्या तब्बल २४० बनावट नोटा जप्त केलेल्या असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवेलगतील ढाब्यावर जाऊन तेथील पानाच्या दुकानातून १०० ते २०० रुपयांची खरेदी करायची आणि दुकानदाराला दोन हजारांची बनावट नोट देऊन उरलेले पैसे घेऊन जायचे अशी पद्धत होती.
पश्चिम बंगालमधून राज्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची तस्करी होत असल्याची बाब ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईतून पुढे आली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या पाच जणांना अटक केल्यानंतर बनावट नोटा महाराष्ट्रात पाठवणाऱ्या आणखी एकाला पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतले आहे. २ लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ५ लाखांच्या बनावट नोटा वटवण्यासाठी देण्यात येत होत्या.
भिवंडीतील वडपे येथील एका ढाब्यावर कारमधून आलेल्या रेहान अब्बास शेख (२२), साफद मुख्तार अन्सारी (१९), अनीस इक्लाख अन्सारी (१९), किशोर नामदेव फुलार (२५) आणि रोहित नागेंद्र सिंग (२३) यांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवड्यात येथील पानटपरीवर दोन हजाराची बनावट नोट वटवताना रंगेहात पकडले होते. यावेळी आरोपींकडून २ हजारांच्या तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांच्या तब्बल २४० बनावट नोटा जप्त केलेल्या असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवेलगतील ढाब्यावर जाऊन तेथील पानाच्या दुकानातून १०० ते २०० रुपयांची खरेदी करायची आणि दुकानदाराला दोन हजारांची बनावट नोट देऊन उरलेले पैसे घेऊन जायचे अशी पद्धत होती.