अ‍ॅपशहर

वसई व्याख्यान

जगभरातील संतसाहित्य मराठीत यावेज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस कोरिया यांचे प्रतिपादन मटा...

Maharashtra Times 20 Apr 2018, 5:00 am

जगभरातील संतसाहित्य मराठीत यावे

ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस कोरिया यांचे प्रतिपादन

म.टा.वृत्तसेवा,वसई

खिस्ती मिशनऱ्यांनी मराठी साहित्याची सेवा करत असताना नवीन संकल्पना आणि तत्त्वविचार मराठी साहित्यात आणला. त्यामुळे येथील धर्म आणि विचार परंपरा समृद्ध झाली. आजही अनेक संत आणि त्यांचे वाड्मय मराठी साहित्यात येण्याची आवश्यकता आहे. तरूण लेखकांनी संशोधन आणि आपल्या प्रतिभेद्वारे मराठी साहित्य विश्वासात संत साहित्याचे नवीन दालन उघडावे. जगभरातील संतसाहित्य मराठीत यावे, असे उदगार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस कोरिया यांनी काढले.

संत लुर्ड्स माता चर्च,शिरलयवाडी येथे फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज लिखित 'कथ लुर्ड्स मातेच्या दर्शनाची' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन लुर्ड्समाता देवस्थानाचे तीर्थाचार्य फादर जॉन कुशेर यांच्या हस्ते झाले. फादर कोरिया म्हणाले, फादर अ‍ॅण्ड्र्यू रॉड्रिग्ज यांनी कठोर परिश्रम आणि श्रद्धा भावनेने जागजिक वारसा लाभलेल्या लुर्ड्स मातेच्या दर्शनाची कहाणी विषद केली आहे. अशा लेखनामुळे भाविकांच्या ज्ञानात भर पडतेच पण त्यांचे अध्यात्मिक जीवन समृद्ध बनते. उत्तम विचारांची जोपासना अशासाठी करायची की त्यातूनच आपल्या आतमधली संवेदना जिवंत राहते.

या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फादर कॅजीटन रॉड्रिग्ज, फादर ज्यो डिमोन्टी, सिल्वेस्टर लोपीस, चित्रकार फिलीप डिमेलो उपस्थित होते. फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज आपल्या मनोगतामध्ये कसोटीच्या प्रसंगात छोटी छोटी माणसे आपल्या जगण्यातून देव अनुभवत असतात आणि इतरांना देवाचा अनुभव देत असतात. त्यांच्या कथा उत्तम माणूस घडविण्यासाठी उपयुक्त आहेत असे ते म्हणाले.

यावेळी कवी सायमन मार्टीन म्हणाले, चर्चच्या वेदीवरून पुस्तक प्रकाशन होणे ही अपूर्व घटना आहे. चर्च आणि साहित्य यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. शब्दसेवा हे चर्चचे आदिकर्तव्य आहे. त्यातून असामान्यबरोबरच सर्वसामान्यांच्या कथा साहित्याच्या माध्यमातून चर्चने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे लोकांपुढे आणण्यासाठी फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज यांनी लेखनाचा ध्यास घेतला तो त्यांच्या अध्यात्म्याचाच भाग होता. आदिवासी आणि गोरगरिबांची सेवा करीत असताना त्यांना लेखणीने नेहमीच जगण्यासाठी बळ आणि प्रेरणा दिली. चारित्र्यवान लेखक समाज घडवत असतात. आजच्या असुरक्षित वातावरणात उत्तम साहित्यच माणसांना धीर आणि विश्वास देईल, असे मतही त्यांनी मांडले.

????

म.टा.वृत्तसेवा,वसई

खिस्ती मिशन-यांनी मराठी साहित्याची सेवा करीत असताना नवीन संकल्पना आणि तत्वविचार मराठी साहित्यात आणला. त्यामुळे येथील धर्म आणि विचार परंपरा समृद्ध झाली. आजही अनेक संत आणि त्यांचे वाडमय मराठी साहित्यात येण्याची आवश्यकता आहे. तरूण लेखकांनी संशोधन आणि आपल्या प्रतिभेव्दारे मराठी साहित्य विश्वासात संत साहित्याचे नवीन दालन उघडावे. जगभरातील संतसाहित्य मराठीत यावे, असे उदगार ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस कोरिया यांनी काढले.

संत लुर्ड्स माता चर्च,शिरलयवाडी येथे फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज लिखित 'कथ लुर्ड्स मातेच्या दर्शनाची' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

पुस्तकाचे प्रकाशन लुर्ड्समाता देवस्थानाचे तीर्थाचार्य फादर जॉन कुशेर यांच्या हस्ते झाले.

साहित्य आणि अत्यात्म यांचा सांगोपांग आढावा घेत फादर कोरिया पुढे म्हणाले, फादर अ‍ॅण्ड्र्यू रॉड्रिग्ज यांनी कठोर परिश्रम आणि श्रद्धा भावनेने जागजिक वारसा लाभलेल्या लुर्ड्स मातेच्या दर्शनाची कहाणी विषद केली आहे. अशा लेखनामुळे भाविकांच्या ज्ञानात भर पडतेच पण त्यांचे अध्यात्मिक जीवन समृद्ध बनते. उत्तम विचारांची जोपासना अशासाठी करायची की त्यातूनच आपल्या आतमधली संवेदना जिवंत राहते. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी फादर कॅजीटन रॉड्रिग्ज, फादर ज्यो डिमोन्टी, सिल्वेस्टर लोपीस, चित्रकार फिलीप डिमेलो उपस्थित होते.

फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज आपल्या मनोगतामध्ये पुस्तक लेखनाचा एकुण प्रवास कथन करून म्हणाले, माऊलीचा ध्यास घेऊन लेखन करीत असताना मला अपार आनंदाचा अनुभव आला. खरेतर कसोटीच्या प्रसंगात छोटी छोटी माणसे आपल्या जगण्यातून देव अनुभवत असतात आणि इतरांना देवाचा अनुभव देत असतात. त्यांच्या कथा उत्तम माणूस घडविण्यासाठी उपयुक्त आहेत असे ते म्हणाले.

यावेळी कवी सायमन मार्टीन म्हणाले, चर्चच्या वेदीवरून पुस्तक प्रकाशन होणे ही अपूर्व घटना आहे. चर्च आणि साहित्य यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. शब्दसेवा हे चर्चचे आदिकर्तव्य आहे. त्यातून असामान्यबरोबरच सर्वसामान्यांच्या कथा साहित्याच्या माध्यमातून चर्चने वेगवेगळ्या माध्यमांव्दारे लोकांपुढे आणण्यासाठी फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज यांनी लेखनाचा ध्यास घेतला तो त्यांच्या अध्यात्म्याचाच भाग होता. आदिवासी आणि गोरगरिबांची सेवा करीत असताना त्यांना लेखणीने नेहमीच जगण्यासाठी बळ आणि प्रेरणा दिली. चारित्र्यवान लेखक समाज घडवत असतात. आजच्या असुरक्षित वातावरणात उत्तम साहित्यच माणसांना धीर आणि विश्वास देईल असे मतही त्यांनी मांडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज