अ‍ॅपशहर

​ ‘सामाजिक स्तर उंचावणारी माणसे समाजापुढे यावीत’

समाजात सामाजिक पर्यावरण विचार मंच तयार व्हायला पाहिजेत, तरच अचाट कार्य करणाऱ्या व्यक्ती समाजासमोर येतील. कुठलाही समाज आपोआप प्रगतिप्रथावर जात नाही तो पुढे घेऊन जाणारी सामाजिक स्तर उंचावणारी माणसं समाजापुढे येणे आवश्यक असते, असे मत लेखिका वीणा गवाणकर यांनी मांडले.

Maharashtra Times 24 Nov 2017, 4:01 am
ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम veena gavankar interview
​ ‘सामाजिक स्तर उंचावणारी माणसे समाजापुढे यावीत’


म. टा. वृत्तसेवा, वसई

समाजात सामाजिक पर्यावरण विचार मंच तयार व्हायला पाहिजेत, तरच अचाट कार्य करणाऱ्या व्यक्ती समाजासमोर येतील. त्या तशा समोर आल्या तर त्यांची बुद्धी, त्यांची क्षमता, त्यांचं असणं आणि त्या सर्वांमागचा विलक्षण संघर्ष समाजाला वेगळे भान देण्यास कारणीभूत ठरू शकतो. कुठलाही समाज आपोआप प्रगतिप्रथावर जात नाही तो पुढे घेऊन जाणारी सामाजिक स्तर उंचावणारी माणसं समाजापुढे येणे आवश्यक असते, असे मत लेखिका वीणा गवाणकर यांनी मांडले.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी ‘मुक्त गप्पां’चा कार्यक्रम अक्षर मानव आणि कोकण मराठी साहित्य परिषद वसई शाखेच्या वतीने भुईगांव डोंगरी येथील सहयोग सेंटर येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी संवादक म्हणून मनोज आचार्य आणि श्रीकांत डांगे यांनी त्यांना प्रश्न विचारले. ‘मुक्त संवादा’च्या या कार्यक्रमात वीणा गवाणकर म्हणाल्या, जगावेगळं काम केलेली कार्व्हर, सलीम अली, लीझ मायटनर, आयडा स्कडर, विलासराव साळूंके, डॉ. खानखोजे यांसारख्या माणसांवर लिहिताना डोळ्यापुढे समाजाच्या वृद्धीचाच विचार होता. मी मुळात ग्रंथपाल असल्याने तो ग्रंथपाल माझ्या अंगात भिनलेला आहे, त्यामुळे कोणतीही व्यक्ती चरित्रासाठी निवडताना, अधिकाअधिक खोल जाऊन त्या व्यक्तींचा शोध घेते. मग त्यांची त्या त्या क्षेत्रातील सैद्धांतिक बाजू मी मुळापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करते, त्यासंबधी खूप वाचते. तेव्हाच मी त्यांचं व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर आणू शकते. मी आजवर जी चरित्रे लिहिली, त्या व्यक्तींच्या कार्याचे विषय हे माझे अभ्यासाचे कधीच नव्हते. मात्र माणसाने आपला मेंदू रगडून वापरला तर, कोणताही विषय त्याला समजू शकतो. हे लक्षात घेऊनच मी त्यांची चरित्र लिहिताना त्यासंदर्भात आव्हाने स्वीकारली आणि ती चरित्र लिहिली, असे त्यांनी सांगितले.

‘आपल्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केलेल्या रॉबीबद्दल खुद्द त्यांच्या जन्मगावात अज्ञान अधिक होते. आपल्या अज्ञानामुळे त्यांचे कर्तृत्व झाकाळून जाऊ नये म्हणून रॉबीवर लिहिलं,’ असे रॉबी डिसिल्वा यांच्यावरील चरित्र ग्रंथासंबधी बोलताना वीणाताई म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज