म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांना मागणी आहे. यासाठी बहुतेकदा सर्व प्रकारच्या शेंगभाज्या वापरल्या जातात. त्यामुळे बाजारात भाज्यांना मागणी वाढली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करता येईल इतका भाजीपाला बाजारात उपलब्धच नसल्याने बाजारात भाज्यांची टंचाई निर्माण झाली आहे. ज्या काही भाज्या बाजारात आहेत त्यांचे दर वाढले आहेत. ज्या भाज्या ३० ते ४० रुपये किलोच्या घरात होत्या, त्या बहुतेक भाज्या घाऊक बाजारातच ४० ते ५० ते ८० रुपये किलो झाल्या आहेत. किरकोळ बाजारात या भाज्या ६० ते ८० आणि शंभर रुपये किलो झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना दररोजच्या भाज्या खरेदी करतानाही खिसा रिकामा करावा लागत आहे.
मुंबईमध्ये पाऊस थांबला असला तरी सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाजीपाला भिजून खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. नेहमीच्या मानाने केवळ ५० टक्के चांगला भाजीपाला बाजारात येत आहे. बाजारात भाज्यांना मोठी मागणी असली तरी इतक्या भाज्याच बाजारात पाहायला मिळत नाहीत. पितृपक्षात प्रामुख्याने गवार, भोपळा, चवळी, भेंडी, तोंडली, शेवगा, घेवडा या भाज्यांना मागणी असते. त्यामुळे बाजारात या भाज्यांना मागणी वाढली आहे. मात्र मागणीइतका पुरवठा होत नसल्याने भाज्यांचे गणित बिघडले आहे. पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्याही कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची निराशा होत आहे.
ज्या भाज्यांना आता मागणी आहे, त्या भाज्यांच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने भाज्यांचे दर दुप्पट नाही तर तिप्पट झाले आहेत. घाऊक बाजारात भेंडी ३५ ते ४० रु किलो, दुधी भोपळा २० ते ४० रु. किलो , फरसबी ४० ते ५० रु. किलो, गवार ४० ते ४५ रु. किलो, घेवडा ३० ते ४० रु. किलो, शेवगा ३५ ते ४५ रु. किलो, तोंडली ४० ते ५० रु. किलो झाली आहे. अन्य भाज्याही ४० ते ५० ते ६० रुपये किलो झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात या भाज्या ६० ते ८० आणि १०० रुपये किलोच्या घरात आहेत.
बाजारात चांगला भाजीपाला येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे. भाज्यांना बाजारात मागणी मोठी आहे. मात्र मागणी पूर्ण करता येईल इतका भाजीपाला येत नसल्याने याचा परिणाम भाज्यांचे दर वाढण्यावर झाला आहे.
सोपान मेहर, व्यापारी
सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांना मागणी आहे. यासाठी बहुतेकदा सर्व प्रकारच्या शेंगभाज्या वापरल्या जातात. त्यामुळे बाजारात भाज्यांना मागणी वाढली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करता येईल इतका भाजीपाला बाजारात उपलब्धच नसल्याने बाजारात भाज्यांची टंचाई निर्माण झाली आहे. ज्या काही भाज्या बाजारात आहेत त्यांचे दर वाढले आहेत. ज्या भाज्या ३० ते ४० रुपये किलोच्या घरात होत्या, त्या बहुतेक भाज्या घाऊक बाजारातच ४० ते ५० ते ८० रुपये किलो झाल्या आहेत. किरकोळ बाजारात या भाज्या ६० ते ८० आणि शंभर रुपये किलो झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना दररोजच्या भाज्या खरेदी करतानाही खिसा रिकामा करावा लागत आहे.
मुंबईमध्ये पाऊस थांबला असला तरी सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाजीपाला भिजून खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. नेहमीच्या मानाने केवळ ५० टक्के चांगला भाजीपाला बाजारात येत आहे. बाजारात भाज्यांना मोठी मागणी असली तरी इतक्या भाज्याच बाजारात पाहायला मिळत नाहीत. पितृपक्षात प्रामुख्याने गवार, भोपळा, चवळी, भेंडी, तोंडली, शेवगा, घेवडा या भाज्यांना मागणी असते. त्यामुळे बाजारात या भाज्यांना मागणी वाढली आहे. मात्र मागणीइतका पुरवठा होत नसल्याने भाज्यांचे गणित बिघडले आहे. पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्याही कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची निराशा होत आहे.
ज्या भाज्यांना आता मागणी आहे, त्या भाज्यांच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने भाज्यांचे दर दुप्पट नाही तर तिप्पट झाले आहेत. घाऊक बाजारात भेंडी ३५ ते ४० रु किलो, दुधी भोपळा २० ते ४० रु. किलो , फरसबी ४० ते ५० रु. किलो, गवार ४० ते ४५ रु. किलो, घेवडा ३० ते ४० रु. किलो, शेवगा ३५ ते ४५ रु. किलो, तोंडली ४० ते ५० रु. किलो झाली आहे. अन्य भाज्याही ४० ते ५० ते ६० रुपये किलो झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात या भाज्या ६० ते ८० आणि १०० रुपये किलोच्या घरात आहेत.
बाजारात चांगला भाजीपाला येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे. भाज्यांना बाजारात मागणी मोठी आहे. मात्र मागणी पूर्ण करता येईल इतका भाजीपाला येत नसल्याने याचा परिणाम भाज्यांचे दर वाढण्यावर झाला आहे.
सोपान मेहर, व्यापारी