विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दरबार पुन्हा सुरू
म. टा. वृत्तसेवा, वसई
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पालघरच्या गड शिवसेना-भाजप या महायुतीने जिंकल्याने बहुजन विकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षीय कार्यकर्ते सक्रिय झाले असून यांसह तब्बल पाच वर्षांनी जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित नव्याने सक्रीय झाले आहेत.
वसईच्या राजकारणात आता पुन्हा नव्याने बदल होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुजन आघाडीला पराभूत केल्याने वसईमधील गणिते बदलण्याची चिन्हे वर्तविण्यात येत असतानाच माजी आमदार विवेक पंडित नव्याने सक्रिय झाले आहेत. २०१४ची निवडणूक पराभूत झाल्यावर पंडित अज्ञातवासात गेले. आपण राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केल्याने वसई विधानसभा क्षेत्रातील बविआ विरोधी गट थंड झाला होता. मात्र निवडणुकीत पंडित यांनी बविआ विरोधात पडद्यामागे राहून कामगिरी बजावली. राज्य सरकारने एसओएम अर्थात स्टेट ऑफ मिनिस्टर हा दर्जा पंडित यांना बहाल केला. लवकरच विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होणार आहे. तत्पूर्वी विवेक पंडित यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला आहे.
मागील विधानसभाची आकडेवारी पाहता पंडित यांना मतदारांनी नाकारले होते. २०१४ मध्ये ठाकूर यांना ९७,२९१ तर पंडित यांना ६५,३९५ मते मिळाली होती. सन २००९ मधे पंडित यांना ८१,३५८ तर बविआ ला ६४,५६० मताधिक्य मिळाले होते. गावे आणि महानगरपालिका हा फॅक्टर चालल्याने पंडित यात बाजी मारून गेले होते. आता पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. गावे वगळण्याची प्रक्रिया जवळ येऊन ठेपली आहे. पुढे तीच प्रक्रिया किचकट होत जाईल तरीही त्याचा फायदा पंडित यांना मिळण्याची शक्यता आहे.
म. टा. वृत्तसेवा, वसई
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत पालघरच्या गड शिवसेना-भाजप या महायुतीने जिंकल्याने बहुजन विकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षीय कार्यकर्ते सक्रिय झाले असून यांसह तब्बल पाच वर्षांनी जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित नव्याने सक्रीय झाले आहेत.
वसईच्या राजकारणात आता पुन्हा नव्याने बदल होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुजन आघाडीला पराभूत केल्याने वसईमधील गणिते बदलण्याची चिन्हे वर्तविण्यात येत असतानाच माजी आमदार विवेक पंडित नव्याने सक्रिय झाले आहेत. २०१४ची निवडणूक पराभूत झाल्यावर पंडित अज्ञातवासात गेले. आपण राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केल्याने वसई विधानसभा क्षेत्रातील बविआ विरोधी गट थंड झाला होता. मात्र निवडणुकीत पंडित यांनी बविआ विरोधात पडद्यामागे राहून कामगिरी बजावली. राज्य सरकारने एसओएम अर्थात स्टेट ऑफ मिनिस्टर हा दर्जा पंडित यांना बहाल केला. लवकरच विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होणार आहे. तत्पूर्वी विवेक पंडित यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला आहे.
मागील विधानसभाची आकडेवारी पाहता पंडित यांना मतदारांनी नाकारले होते. २०१४ मध्ये ठाकूर यांना ९७,२९१ तर पंडित यांना ६५,३९५ मते मिळाली होती. सन २००९ मधे पंडित यांना ८१,३५८ तर बविआ ला ६४,५६० मताधिक्य मिळाले होते. गावे आणि महानगरपालिका हा फॅक्टर चालल्याने पंडित यात बाजी मारून गेले होते. आता पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. गावे वगळण्याची प्रक्रिया जवळ येऊन ठेपली आहे. पुढे तीच प्रक्रिया किचकट होत जाईल तरीही त्याचा फायदा पंडित यांना मिळण्याची शक्यता आहे.