म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
आयटीआयच्या वसतिगृहातील अस्वच्छता आणि सुविधांअभावी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत ‘मटा’ने बातमी प्रसिद्ध केली असता, या बातमीची दखल घेत आयटीआय प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छता आणि इतर समस्या मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. याच बातमीची दखल घेत मनविसेने गुरुवारी आयटीआयच्या प्राचार्यांची भेट घेत येत्या १५ दिवसांत वसतिगृहातील स्वच्छता आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तत्काळ इतर सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्राव्दारे देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दीडशे विद्यार्थी अंबरनाथ येथील कल्याण-बदलापूर मार्गावर असलेल्या आयटीआयमधील वसतिगृहात राहतात. या वसतिगृहात ३०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. साधारण नऊ कोटी रुपये खर्च करून, हे वसतिगृह तयार करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात वसतिगृहाला समस्यांनी घेरले असल्याने याच दुरवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत ‘मटा’ने बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर या बातमीची दखल घेत आयटीआय प्रशासनाने तत्काळ
अनेक समस्या मार्गी लावण्याचे काम हाती घेतले असले तरी अद्याप अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मनविसेच्या प्रतिनिधी मंडळाने आयटीआयच्या प्राचार्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्याबाबत जाब विचारला. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास मनविसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा प्राचार्य के. डी. शिंदे यांना पत्राद्वारे दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर सर्वत्र स्वच्छता आणि इतर सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे प्राचार्य के. डी. शिंदे यांनी सांगितले.
आयटीआयच्या वसतिगृहातील अस्वच्छता आणि सुविधांअभावी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत ‘मटा’ने बातमी प्रसिद्ध केली असता, या बातमीची दखल घेत आयटीआय प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छता आणि इतर समस्या मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. याच बातमीची दखल घेत मनविसेने गुरुवारी आयटीआयच्या प्राचार्यांची भेट घेत येत्या १५ दिवसांत वसतिगृहातील स्वच्छता आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तत्काळ इतर सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्राव्दारे देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दीडशे विद्यार्थी अंबरनाथ येथील कल्याण-बदलापूर मार्गावर असलेल्या आयटीआयमधील वसतिगृहात राहतात. या वसतिगृहात ३०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. साधारण नऊ कोटी रुपये खर्च करून, हे वसतिगृह तयार करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात वसतिगृहाला समस्यांनी घेरले असल्याने याच दुरवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत ‘मटा’ने बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर या बातमीची दखल घेत आयटीआय प्रशासनाने तत्काळ
अनेक समस्या मार्गी लावण्याचे काम हाती घेतले असले तरी अद्याप अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मनविसेच्या प्रतिनिधी मंडळाने आयटीआयच्या प्राचार्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्याबाबत जाब विचारला. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास मनविसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा प्राचार्य के. डी. शिंदे यांना पत्राद्वारे दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर सर्वत्र स्वच्छता आणि इतर सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे प्राचार्य के. डी. शिंदे यांनी सांगितले.