अ‍ॅपशहर

लक्ष टक्केवारीकडे

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, एक दिवसाचा छुपा प्रचार संपल्यानंतर अखेर मंगळवारी २० पॅनलमधील ७८ प्रभागांसाठी ४७९ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे. यंदाचे मतदान शहरातील राजकीय इतिहास बदलण्याचा मार्गावर आहे. पहिल्यांदा मतदान जनजागृतीसाठी प्रशासनासोबत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
२५४ वाहनांसह, साडेतीन हजार निवडणूक कर्मचारी सज्ज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम watch on percentage of voting
लक्ष टक्केवारीकडे


म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, एक दिवसाचा छुपा प्रचार संपल्यानंतर अखेर मंगळवारी २० पॅनलमधील ७८ प्रभागांसाठी ४७९ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे. यंदाचे मतदान शहरातील राजकीय इतिहास बदलण्याचा मार्गावर आहे. पहिल्यांदा मतदान जनजागृतीसाठी प्रशासनासोबत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील विविध शहरांतून आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांची सोमवारी दिवसभर ईव्हीएम मशिन ताब्यात घेत मतदान केंद्राकडे जाण्याची लगबग सुरू होती. यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभागरचनेत झालेल्या बदलामुळे शहरातील २० पॅनलमध्ये ७८ प्रभागांसाठी एकूण ४७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहरात एकूण ५४३ मतदान केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात दोन ते तीन ईव्हीएम यंत्रणा ठेवण्यात येणार असून पॅनल क्रमांक १८मध्ये ५४ उमेदवार असल्याने या मतदान केंद्रावर पाच मशिन ठेवण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ३५०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत सोडणे आणि संध्याकाळी परत सोडण्यासाठी एकूण ५५४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १३७ बस, १११ जीप आणि ६ ट्रकचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज