म. टा. वृत्तसेवा, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग्रामीण भागासह औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जीर्ण झालेल्या पाइपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्याबरोबरच ठिकठिकाणी असलेल्या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळतीही सुरू आहे. यामुळे दिवसाला लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
एमआयडीसीकडून औद्योगिक क्षेत्रासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी उल्हास नदीतून दररोज ८५० दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जाते. मात्र हा पाणीपुरवठा करण्यासाठी वापरली जाणारी १८०० मिमी व्यासाची पाइपलाईन ४० वर्षांहून अधिक जुनी झाली आहे. पाण्याच्या दाब वाढताच पाइपलाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे नागरिकांना अघोषित पाणीबाणी सहन करावी लागते. दुरुस्तीला किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. परिणामी नागरिकांचे हाल होतात. त्यातच या पाइपलाईनवर ठिकठिकाणी हवा बाहेर फेकण्यासाठी असलेल्या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असते. प्रत्येक व्हॉल्वमधून दिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. या व्हॉल्वच्या परिसरातील झोपडपट्टीमधील नागरिक पिण्यासाठी हे पाणी वापरतात. मुलांच्या आंघोळी, कपडे धुणे हे प्रकारदेखील या व्हॉल्वखाली बिनबोभाट सुरू असतात.
वर्षानुवर्षे पाइपलाईनच्या व्हॉल्वमधून पाणीगळती होत असतानाही एमआयडीसीकडून गळती रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. डोंबिवली एमआयडीसीमध्ये अशाच प्रकारे अनेक ठिकाणी पाणीगळती सुरू असून, दिवसाला लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. मात्र एमआयडीसीकडून वर्षानुवर्षे पाइपलाईन बदलण्याचे काम सुरूच असून अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना कधी कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीने पाणीगळती थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग्रामीण भागासह औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जीर्ण झालेल्या पाइपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्याबरोबरच ठिकठिकाणी असलेल्या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळतीही सुरू आहे. यामुळे दिवसाला लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
एमआयडीसीकडून औद्योगिक क्षेत्रासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी उल्हास नदीतून दररोज ८५० दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जाते. मात्र हा पाणीपुरवठा करण्यासाठी वापरली जाणारी १८०० मिमी व्यासाची पाइपलाईन ४० वर्षांहून अधिक जुनी झाली आहे. पाण्याच्या दाब वाढताच पाइपलाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे नागरिकांना अघोषित पाणीबाणी सहन करावी लागते. दुरुस्तीला किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. परिणामी नागरिकांचे हाल होतात. त्यातच या पाइपलाईनवर ठिकठिकाणी हवा बाहेर फेकण्यासाठी असलेल्या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असते. प्रत्येक व्हॉल्वमधून दिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी होते. या व्हॉल्वच्या परिसरातील झोपडपट्टीमधील नागरिक पिण्यासाठी हे पाणी वापरतात. मुलांच्या आंघोळी, कपडे धुणे हे प्रकारदेखील या व्हॉल्वखाली बिनबोभाट सुरू असतात.
वर्षानुवर्षे पाइपलाईनच्या व्हॉल्वमधून पाणीगळती होत असतानाही एमआयडीसीकडून गळती रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. डोंबिवली एमआयडीसीमध्ये अशाच प्रकारे अनेक ठिकाणी पाणीगळती सुरू असून, दिवसाला लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. मात्र एमआयडीसीकडून वर्षानुवर्षे पाइपलाईन बदलण्याचे काम सुरूच असून अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना कधी कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीने पाणीगळती थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.