म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
वांगणीतील वाढत्या लोकसंखेला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेली योजना मागील दोन वर्षांपासून शासकीय यंत्रणा, कंत्राटदार यांच्या समन्वयाभावी गटांगळ्या खात आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
वांगणी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे त्याचा प्राथमिक सोयीसुविधांवर ताण पडत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार वांगणीची पाण्याची मागणी लक्षात घेता आघाडी सरकारच्या काळात वांगणीसाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. ऑगस्ट २०१४मध्ये या कामाचे आदेशही देण्यात आले. या योजनेसाठी सरकारने १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेमुळे वांगणीच्या
नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र मागील दोन वर्षांपासून विविध कारणांनी या योजनेच्या कामात अडथळे निर्माण झाले. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या आणि खासगी जागांमधून जलवाहिन्या टाकण्याच्या कामात नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे पहिल्यांदा योजनेचे काम रखडले. तर या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्यातील समन्वयाचा अभावामुळे काम रखडल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. योजनेचा एक टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक जलकुंभासाठी जागाच उपलब्ध नसल्याने पुन्हा या कामात खोडा आला आहे. याबाबत प्राधिकरणाच्या ए. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, पाणीपुरवठा योजनेच्या तीनही टप्प्यांना मंजुरी मिळाल्याने लवकरच जागेचा प्रश्नही सुटेल आणि काम लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत सदस्य आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनी केली आहे.
वांगणीतील वाढत्या लोकसंखेला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेली योजना मागील दोन वर्षांपासून शासकीय यंत्रणा, कंत्राटदार यांच्या समन्वयाभावी गटांगळ्या खात आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
वांगणी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे त्याचा प्राथमिक सोयीसुविधांवर ताण पडत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार वांगणीची पाण्याची मागणी लक्षात घेता आघाडी सरकारच्या काळात वांगणीसाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. ऑगस्ट २०१४मध्ये या कामाचे आदेशही देण्यात आले. या योजनेसाठी सरकारने १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या योजनेमुळे वांगणीच्या
नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र मागील दोन वर्षांपासून विविध कारणांनी या योजनेच्या कामात अडथळे निर्माण झाले. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या आणि खासगी जागांमधून जलवाहिन्या टाकण्याच्या कामात नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे पहिल्यांदा योजनेचे काम रखडले. तर या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्यातील समन्वयाचा अभावामुळे काम रखडल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. योजनेचा एक टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक जलकुंभासाठी जागाच उपलब्ध नसल्याने पुन्हा या कामात खोडा आला आहे. याबाबत प्राधिकरणाच्या ए. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, पाणीपुरवठा योजनेच्या तीनही टप्प्यांना मंजुरी मिळाल्याने लवकरच जागेचा प्रश्नही सुटेल आणि काम लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत सदस्य आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनी केली आहे.