म. टा. वृत्तसेवा, ठाणे
पिसे जलशुद्धिकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी ठाणे शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना आता इंदिरानगर, ज्ञानोदय शाळेजवळच्या जलकुंभाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतल्याने वागळे इस्टेट परिसराला पुढील पंधरवड्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
२९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा बंद करून जलवाहिन्यांमधून थेट पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे असमान पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्ष्मीपार्क परिसर, म्हाडा-डवलेनगर, सावरकरनगर, इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, लोकमान्यनगरचा बसडेपो जवळचा भाग, ज्ञानेश्वर नगर व जयभवानी नगरचा काही भाग इत्यादी ठिकाणच्या परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत पाण्याचा योग्य तो साठा व वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पिसे जलशुद्धिकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी ठाणे शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना आता इंदिरानगर, ज्ञानोदय शाळेजवळच्या जलकुंभाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतल्याने वागळे इस्टेट परिसराला पुढील पंधरवड्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
२९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा बंद करून जलवाहिन्यांमधून थेट पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे असमान पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्ष्मीपार्क परिसर, म्हाडा-डवलेनगर, सावरकरनगर, इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, लोकमान्यनगरचा बसडेपो जवळचा भाग, ज्ञानेश्वर नगर व जयभवानी नगरचा काही भाग इत्यादी ठिकाणच्या परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा हा कमी दाबाने होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत पाण्याचा योग्य तो साठा व वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.