ठाणे:
उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या ७० लाख प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत असून या समस्या सोडवण्यासाठी खासदार हे एकमेव माध्यम असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाते. दिल्लीमध्ये आपला आवाज पोहोचवून चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळवण्याच्या अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये नव्या आणि आकर्षक घोषणाही करण्यात आल्या. परंतु हे प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने मात्र कोणतेही प्रयत्न सरकारकडून झालेले नाहीत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करणारे सरकार हवे, …अशा भावना प्रवासी व्यक्त करत आहे.
विशेष झोन व्हावे…
मध्य रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम गेल्या १० वर्षांपासून रेंगाळत सुरू आहे. पादचारी पुलांची कामे अर्धवट रखडली आहेत, नवी स्थानके, नवी मार्गिका, नव्या गाड्या घोषित झाल्या तरी त्यांच्या पूर्णत्वाची डेडलाइन उलटली आहे. घोषित केलेल्या एमयुटीपी प्रकल्पांची कामे कागदावरच आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी रेल्वेचे विशेष झोन घोषित होण्याची गरज आहे.
गुण - ६/१०
नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना, ठाणे
विमा संरक्षण मिळावे
उपनगरी रेल्वे प्रवास प्रचंड जाचाचा आणि जीवघेणा आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी विमा संरक्षणाची गरज आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची, रुंदी, स्वच्छतागृहे, अपघात सुविधा, परिचालक विभाग आणि प्रवासी सुरक्षा या संदर्भात रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय मानांकनाचे पालन व्हावे. अत्यावश्यक रेल्वे मार्ग, शक्य असेल त्या स्थानकात दुहेरी प्लॅटफॉर्म, पुरेशा नवीन लोकल आणि रेल्वे स्थानकांचा नियोजनबद्ध विकास आणि विस्तार या गोष्टींना रेल्वे मंत्रालयाने प्राधान्य द्यावे.
गुण - ४/१०
मनोहर शेलार, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
सुरक्षेला बळ हवे
महिलांच्या सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या मंडळींकडून सत्तेमध्ये आल्यानंतर यंत्रणांच्या सबलीकरणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महिलांसाठी आवश्यक सुरक्षायंत्रणा अद्याप मिळालेली नाही. २० लाख प्रवासी संख्या असलेली पोलिस आणि सुरक्षा दलाची यंत्रणा प्रवाशांची संख्या ७० लाखांपर्यंत पोहोचली तरी तितकीच आहे. उलट रेल्वे स्थानके वाढली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नवी यंत्रणा उभारली नाही. त्यामुळे रिक्त पदे असतानाही त्याची भरती झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
गुण - ५/१०
लता आरगडे, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना, डोंबिवली
रेल्वे प्रवाशांच्या मागण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्रे लिहित असतो. मागील दहा वर्षांत आम्ही आमच्या मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा यांच्याशिवाय एकाही खासदाराने आमच्या पत्राला उत्तर दिले नाही. नागपूर गाडी सुरू करण्यासाठी आम्ही मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत. शेगाव गाडी सुरू झाली, मात्र नागपूरला थेट गाडी सुरू करण्यास आम्हाला अपयश आले आहे. एक खासदार वगळता महाराष्ट्रातील ४७ खासदारांनी आमच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली, हे गंभीर वाटते.
गुण - ३/१०
डॉ. भक्तीकुमार दवे, अध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे गाड्या आणि रुळ वाढवण्याची नितांत गरज असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या घोषित केलेली ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका, यांची कामे वेळेत पूर्ण होण्याची गरज आहे. कल्याणमधील प्लॅटफॉर्मचा रामभरोसे कारभार थांबवण्यासाठी कल्याण यार्डाचा विस्तार लवकर पूर्ण होण्याची गरज आहे. कल्याणपलिकडे अपघातग्रस्तांसाठी एकही आरोग्य केंद्र नसल्यामुळे रेल्वेकडून या भागातील जखमींवर उपचार करणारे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज रुग्णालय सुरू करावे.
गुण - २/१०
श्याम ओबाळे, के३ रेल्वे प्रवासी संघटना
उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या ७० लाख प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत असून या समस्या सोडवण्यासाठी खासदार हे एकमेव माध्यम असल्यामुळे त्यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाते. दिल्लीमध्ये आपला आवाज पोहोचवून चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळवण्याच्या अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये नव्या आणि आकर्षक घोषणाही करण्यात आल्या. परंतु हे प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने मात्र कोणतेही प्रयत्न सरकारकडून झालेले नाहीत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करणारे सरकार हवे, …अशा भावना प्रवासी व्यक्त करत आहे.
विशेष झोन व्हावे…
मध्य रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम गेल्या १० वर्षांपासून रेंगाळत सुरू आहे. पादचारी पुलांची कामे अर्धवट रखडली आहेत, नवी स्थानके, नवी मार्गिका, नव्या गाड्या घोषित झाल्या तरी त्यांच्या पूर्णत्वाची डेडलाइन उलटली आहे. घोषित केलेल्या एमयुटीपी प्रकल्पांची कामे कागदावरच आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी रेल्वेचे विशेष झोन घोषित होण्याची गरज आहे.
गुण - ६/१०
नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना, ठाणे
विमा संरक्षण मिळावे
उपनगरी रेल्वे प्रवास प्रचंड जाचाचा आणि जीवघेणा आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी विमा संरक्षणाची गरज आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची, रुंदी, स्वच्छतागृहे, अपघात सुविधा, परिचालक विभाग आणि प्रवासी सुरक्षा या संदर्भात रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय मानांकनाचे पालन व्हावे. अत्यावश्यक रेल्वे मार्ग, शक्य असेल त्या स्थानकात दुहेरी प्लॅटफॉर्म, पुरेशा नवीन लोकल आणि रेल्वे स्थानकांचा नियोजनबद्ध विकास आणि विस्तार या गोष्टींना रेल्वे मंत्रालयाने प्राधान्य द्यावे.
गुण - ४/१०
मनोहर शेलार, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
सुरक्षेला बळ हवे
महिलांच्या सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या मंडळींकडून सत्तेमध्ये आल्यानंतर यंत्रणांच्या सबलीकरणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महिलांसाठी आवश्यक सुरक्षायंत्रणा अद्याप मिळालेली नाही. २० लाख प्रवासी संख्या असलेली पोलिस आणि सुरक्षा दलाची यंत्रणा प्रवाशांची संख्या ७० लाखांपर्यंत पोहोचली तरी तितकीच आहे. उलट रेल्वे स्थानके वाढली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नवी यंत्रणा उभारली नाही. त्यामुळे रिक्त पदे असतानाही त्याची भरती झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
गुण - ५/१०
लता आरगडे, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना, डोंबिवली
रेल्वे प्रवाशांच्या मागण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्रे लिहित असतो. मागील दहा वर्षांत आम्ही आमच्या मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा यांच्याशिवाय एकाही खासदाराने आमच्या पत्राला उत्तर दिले नाही. नागपूर गाडी सुरू करण्यासाठी आम्ही मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत. शेगाव गाडी सुरू झाली, मात्र नागपूरला थेट गाडी सुरू करण्यास आम्हाला अपयश आले आहे. एक खासदार वगळता महाराष्ट्रातील ४७ खासदारांनी आमच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली, हे गंभीर वाटते.
गुण - ३/१०
डॉ. भक्तीकुमार दवे, अध्यक्ष, पनवेल प्रवासी संघ
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे गाड्या आणि रुळ वाढवण्याची नितांत गरज असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या घोषित केलेली ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका, यांची कामे वेळेत पूर्ण होण्याची गरज आहे. कल्याणमधील प्लॅटफॉर्मचा रामभरोसे कारभार थांबवण्यासाठी कल्याण यार्डाचा विस्तार लवकर पूर्ण होण्याची गरज आहे. कल्याणपलिकडे अपघातग्रस्तांसाठी एकही आरोग्य केंद्र नसल्यामुळे रेल्वेकडून या भागातील जखमींवर उपचार करणारे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज रुग्णालय सुरू करावे.
गुण - २/१०
श्याम ओबाळे, के३ रेल्वे प्रवासी संघटना